शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस निरीक्षकांना निर्देश ं

By admin | Updated: July 25, 2016 00:40 IST

लातूर : उदगीर तालुक्यातील कल्लूरनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

लातूर : उदगीर तालुक्यातील कल्लूरनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी आपल्या किती कर्मचाऱ्यांकडे प्रवासी वाहने आहेत, याची माहिती संकलित करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना ‘ग्रुप’ कॉलव्दारे आपल्या हद्दीत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांना आवर घालण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, ज्या दिवशी या सूचना दिल्या होत्या त्याच दिवशी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास अहमदपूर-उदगीर राज्य मार्गावरील कल्लूर ते एकुर्का रोड दरम्यान कंटनेर-जीपचा भीषण अपघात झाला. आपल्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर प्रथमत: दिला होता. मात्र, हा इशारा गांभीर्याने न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अपघातानंतर रस्त्यावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागिदारी असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ४जिल्हा पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी आपला मुलगा, पत्नी, भाऊ आणि जवळच्या नातेकवाईकांच्या नावे प्रवासी वाहतुकीसाठी वाहन खरेदी केल्याचे पुढे आले आहे. परिणामी, या वाहनांना पोलिस दलातील आपले वजन वापरुन बळ दिले जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर ही वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून धावत असल्याची चर्चा जिल्हा पोलिस दलात सुरु झाली. याबाबत माध्यमातून वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, देवणी, चाकूर, जळकोट, औसा, रेणापूर आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीत पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांची वाहने असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाल्यानंतर, त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी खास विश्वासातील कर्मचाऱ्यांवर काम सोपविले आहे.४जिल्ह्यातील आपल्या हद्दीत अवैध व्यवसायाला खतपाणी घालत पाठबळ देणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी अशा अवैध व्यवसायाला पाठिशी न घालता आपल्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करावेत, कायदा आणि सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अवैध व्यवसायात ज्यांचा-ज्यांचा सहभाग राहील, अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी दिली आहे.