शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
4
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
5
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
6
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
7
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
8
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
9
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
10
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
11
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
12
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
13
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
14
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
15
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
16
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
17
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
18
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
19
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
20
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   

२९० रुग्णांची तपासणी

By admin | Updated: December 19, 2015 23:47 IST

उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल

उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल २९० जणांच्या विविध तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले़मुंबईतील डॉ़ निर्मल सूर्या, इपिलेप्सी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक व्ही़ एम़ कुलकर्णी, डॉ. डॉ. निर्मल सूर्या यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी २९० रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले़ यात ५२ जणांची ईसीजी, १९ जणांचे सीटीस्कॅन, ८ जणांची प्रयोगशाळा तपासणी करून तीन महिन्यांसाठी औषधोपचार देण्यात आले़ यावेळी बोलताना डॉ़ सूर्या म्हणाले, ईपीलेप्सी हा आजारही इतर आजारांप्रमाणे नियमित औषधोपचाराने बरा होतो़ ज्या प्रमाणे अतिरिक्त दाब, शूगर आदी आजाराप्रमाणे फक्त २५ टक्के रूग्णांना कायमस्वरूपी उपचार घेण्याची गरज असून, उर्वरित ८० टक्के रूग्ण कायमचे बरे होवू शकतात, असे सांगून इपिलेप्सी आजाराबाबत माहिती दिली़ दरम्यान, इपिलेप्सी आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी यावेळी माहिती दिली़ तसेच ज्या- ज्या ठिकाणी फाऊंडेशनच्या वतीने शिबीर घेतले जाणार आहे, तेथे संबंधित रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ माले यांनी यावेळी केले़यावेळी डॉ़ बापूजी सावंत, डॉ़ दीपक पालांडे, डॉ़ उषा व इपिलेप्सी फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱबी़पवार, आयएमईचे अध्यक्ष डॉ़ सुरेश करंजकर, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दूल लतिफ माजीद, सुनिल शेंडगे आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)