शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

विद्यापीठामागे लागणार चौकशीचा ससेमिरा

By admin | Updated: August 30, 2016 01:17 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील मागील काही वर्षांत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता असून, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तसे सूचित केले आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मागील काही वर्षांत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता असून, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तसे सूचित केले आहे. राज्यमंत्री वायकर हे १ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत येणार होते. तसा दौराही आला होता. या दौऱ्यात ते विद्यापीठातील गैरव्यवहारासंदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या विषयाच्या अनुषंगाने कुलगुरू, कुलसचिव आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करणार होते. सोमवारी सायंकाळी वायकर यांचे शहरात आगमन झाले. त्यानंतर ते परभणीच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, विद्यापीठाच्या महिला वसतिगृहासंदर्भात काही तक्रारी आहेत. त्या तक्रारींसंदर्भातही आपण विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. १ सप्टेंबर रोजीची बैठक रद्द झाल्याने विद्यापीठावरील संकट तूर्तास टळले आहे. मात्र, आपण लवकरच विद्यापीठात येऊन तक्रारींसंदर्भात बैठक घेणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. यामुळे आगामी काळात वायकर हे विद्यापीठाला केव्हाही भेट देणार असून, विद्यापीठाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. घोटाळ्यांची मोठी जंत्रीच; कारवाई मात्र शून्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आॅगस्ट २०१५ मध्ये सुमारे २५ लाख रुपये खर्च करून केलेला विदेश दौरा चांगलाच गाजला होता. विदेश दौऱ्यावर गेलेल्या तत्कालीन व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून रक्कम वसूल करण्याचे कुलगुरूंनी जाहीर केले होते. मात्र ही रक्कम वसूल करण्यात आली नाही. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी विद्यापीठाकडून घेतलेले मोबाईल आणि लॅपटॉप परत दिलेच नाहीत. काही अधिकारी आणि प्राध्यापक ते घरी नेऊन वापरत आहेत. यासंदर्भातही वसुली करण्याचा निर्णय होऊनही पुढे काहीच हालचाल झाली नाही. विद्यापीठात अनेक विभागांत बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यावरही अनेक प्राध्यापक काम करीत आहेत. त्यांना वेतनवाढही मिळत आहे. याशिवाय रोजंदारीतील ठराविक कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे विद्यापीठाच्या सेवेत घेण्याचाही प्रकार झाला आहे. सहा कोटी रुपयांचा सॉफ्टवेअर खरेदी घोटाळाही विद्यापीठात गाजला.