शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

‘सारथी’कडून फेलोशिपसाठी दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पीएच.डी. तसेच एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून ‘राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप’ तसेच ‘बार्टी’ मार्फत फेलोशिप दिली ...

औरंगाबाद : पीएच.डी. तसेच एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून ‘राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप’ तसेच ‘बार्टी’ मार्फत फेलोशिप दिली जाते. सारथी’ने दुजाभाव न करता पात्र विद्यार्थ्यांना पीएच.डी. तसेच एम.फिल.च्या प्रवेश दिनांकापासून ती दिली पाहिजे, असा सूर राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये उमटला आहे.

‘सारथी’मार्फत सन २०१८ पासून मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप (अधिछात्रवृत्ती) दिली जाते. सप्टेंबर २०१९ मध्ये या फेलोशिपसाठी जाहिरात आली होती. जाहिरातीनुसार ३० जानेवारी २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तत्पूर्वी, ‘सारथी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत या ५०२ जागांना मान्यताही देण्यात आली. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ‘सारथी’ मार्फत कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. वर्षभरानंतर २३ डिसेंबर २०२० रोजी कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ३४२ विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर २३ ते २७ मार्च २०२१ दरम्यान पुणे येथील ‘सारथी’च्या कार्यालयात २४१ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधनकार्याला आता दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे; पण अद्यापही त्यांची फेलोशिपकरिता निवड जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, विद्यार्थ्यांची ज्या दिवशी फेलोशिपसाठी निवड होईल, तेव्हापासून ती देण्याचा निर्णय या कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.

चौकट.....

यासंदर्भात संशोधक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी महावीर चव्हाण यांनी सांगितले की, आर्थिक विवंचनेमुळे अनेक मराठा किंवा कुणबी प्रवर्गाचे तरुण उच्चशिक्षणापासून वंचित राहत आहेत. ‘सारथी’ देत असलेल्या फेलोशिपच्या भरवशावर अनेक विद्यार्थी संशोधनकार्य करत असून दोन वर्षे झाली, तरी अद्यापही त्यांना फेलोशिप देण्यात आलेली नाही, ही खेदजनक बाब आहे. मुलाखत देणाऱ्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात यावी व ती विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये संशोधनकार्यासाठी प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून द्यावी, अन्यथा ‘सारथी’ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.