शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
4
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
5
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
6
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
7
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
8
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
9
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
10
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
11
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
12
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
14
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
15
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
16
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
17
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
18
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
19
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
20
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!

उच्चस्तरीय संशोधन केंद्रासाठी पुढाकार हवा

By admin | Updated: July 23, 2014 00:42 IST

तुकाराम तांबे , औरंगाबाद जुने फळसंशोधन केंद्र व एक लाख रुपये मराठवाडा कृषी विद्यापीठाने औरंगाबाद नगरपालिकेला सार्वजनिक बाग करण्यासाठी देऊन त्या बदल्यात हिमायत बाग ताब्यात घेतली.

तुकाराम तांबे , औरंगाबादजुने फळसंशोधन केंद्र व एक लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने औरंगाबाद नगरपालिकेला सार्वजनिक बाग करण्यासाठी देऊन त्या बदल्यात ४०.५ हेक्टर क्षेत्रफळाची हिमायत बाग २१ आॅक्टोबर १९७४ रोजी ताब्यात घेतली. त्यानंतर १९७५-७६ च्या दरम्यान हिमायत बागेच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून सध्याच्या फळसंशोधन केंद्राचे क्षेत्रफळ ११६.६४ हेक्टर आहे. हिमायत बाग ही फार जुनी आणि ऐतिहासिक बाग असून ती पूर्वी हैदराबाद येथील एच.ई.एच. निजाम यांची खाजगी बाग होती. हैदराबादचे एच.ई.एच. निजाम हे ज्या-ज्या वेळी औरंगाबादला येत असत त्या-त्या वेळी त्यांचे वास्तव्य किलेअर्क येथे असे. किलेअर्क या वास्तूला लागूनच हिमायत बाग आहे. या बागेत आंबा, पेरू, चिंच, बोर, कवठ, जांभूळ इत्यादी फळांच्या दुर्मिळ वाणांचा संग्रह करण्यात आलेला आहे. फळसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या फळझाडांच्या जातीमध्ये आंब्यामध्ये निरंजन, चिंचेमध्ये प्रतिष्ठान, नं. २६३ आणि अजिंठा गोड चिंच प्रसारित केली आहे, तसेच कवठामध्ये एलोरा, बोरामध्ये मुक्ता, अजिंरामध्ये दिनकर, बिबामध्ये सलेक्शन ३ व ४ आणि सीताफळामध्ये ताड पिंपळगाव-७ नावाच्या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. बागेच्या चारही बाजूने लोकवस्ती आहे. ३० टक्के सीमेवरती संरक्षित भिंतीचे काम झालेले आहे. ४० टक्के सीमेवरील संरक्षण भिंतीचे काम न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे होऊ शकलेले नाही, तसेच ३० टक्के सीमांवर लोकांच्या उपद्रवामुळे संरक्षक भिंतीची पडझड झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ, मोकाट जनावरांची कळपे व गुंड लोकांची आडदांडशाही वाढत आहे. ९४ मंजूर पदापैकी फक्त ४२ पदे भरलेली असून ५२ पदे रिक्त, तसेच १२ कुशल/अर्धकुशल कर्मचारी मंजूर पदांपैकी ११ पदे भरलेली असून १ पद रिक्त व २४ रोजंदारी अकुशल मजुरांपैकी २१ रोजंदारी मजुराची पदे भरलेली असून ३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्व दैनंदिन कामावर, तसेच महसुली उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे.हिमायतबागेसंबंधी एकूण १७ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे, तसेच ही प्रकरणे हाताळण्यासाठी अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे अधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त वेळ विकास संशोधन व प्रशासन याकामाच्या ऐवजी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यामध्ये जास्त जात आहे. काय करायला हवे?अंतर्गत वाहतुकीस नियंत्रण, नागरिकांचा ठराविक कालावधीमध्ये प्रवेश, मोकाट जनावरांपासून संरक्षण, चोरींवर नियंत्रण या बाबी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी स्थानिर्क, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे सहकार्य आवश्यक असून जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाची आवश्यकता आहे. अशा प्रकारे एकात्मिक नियंत्रण मिळाल्यास हिमायतबाग एक उच्च स्तरीय संशोधन केंद्र म्हणून नावारूपास येऊ शकेल.