शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इन्फ्रा दोनचे काम कासवगतीने सुुरू

By admin | Updated: July 28, 2015 01:17 IST

औरंगाबाद : महावितरण परिमंडळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची कामे करीत आहे; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे अद्यापही अनेक ग्राहक

औरंगाबाद : महावितरण परिमंडळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची कामे करीत आहे; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे अद्यापही अनेक ग्राहक सेवेपासून कोसोदूर आहेत. त्यामुळे इन्फ्रा दोनच्या कामांची गती वाढवावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. ग्राहकांची वाढती संख्या व विजेच्या मागणीमुळे कंपनीला सेवा-सुविधा देताना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. परिमंडळातील अनेक भागांत अद्यापही विद्युत लाईन न टाकल्यामुळे शेतकरी आणि नागरिक वीजजोडणीपासून कोसोदूर आहेत. ग्राहकांना सेवा आणि सुविधा देता यावी म्हणून पायाभूत आराखडा दोन (इन्फ्रा-२) मध्ये औरंगाबाद शहर - ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात ३४८ कोटी ४७ लाख रुपयांचे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात ११ सब-स्टेशन, कन्नड- ९ तर जालन्यामध्ये ९ सब-स्टेशन उभारण्यात येणार आहेत. परिमंडळात हायटेन्सेनची १ हजार ८१४ कि़ मी.ची लाईन टाकण्यात येणार आहे. तर भूमिगत हायटेन्सेनची लाईन ५ कि. मी. टाकण्यात येणार आहे. एल.टी. लाईन २०५२ कि़ मी. टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात २५० कि़मी., कन्नड-३४० कि़ मी., जालना जिल्ह्यात १४५२ कि़ मी. लाईनचा समावेश आहे. परिमंडळात २,८७३ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. २०५२ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. (६३ केव्ही रोहित्रांच्या ठिकाणी १०० केव्हीचे रोहित्र बसविण्यात येणार आहेत.) या साडेतीनशे कोटींच्या कामांपैकी बहुतांशी कामे सुरू करण्यात आलेली आहेत; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे त्याचा फटका कंपनी आणि ग्राहकांना बसत आहे. शेतात आणि वाड्या- वस्त्यांमध्ये विद्युत लाईन नसल्यामुळे आजही अनेक ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. जोडणी मिळत नसल्यामुळे नागरिक आकडा टाकून वीज घेतात. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.