शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

विषमतेमुळे देशाच्या एकात्मतेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST

औरंगाबाद : देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आली आहे. आर्थिक विषमतेमुळे शैक्षणिक, सामाजिक असमानता निर्माण झाली आहे. एकीकडे अब्जोपतींची ...

औरंगाबाद : देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आली आहे. आर्थिक विषमतेमुळे शैक्षणिक, सामाजिक असमानता निर्माण झाली आहे. एकीकडे अब्जोपतींची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे देशाची एकात्मताच धोक्यात आली आहे, अशी खंत माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केली.

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतीय संविधान आणि नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृष्णा भोगे म्हणाले, भारतीय राज्यघटनेमध्ये प्राथमिक तसेच उच्च शिक्षणाविषयी वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. राज्यघटनेत प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, यादृष्टीने अधिकार दिले आहेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. शिक्षण प्रत्येकाला मिळाले पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागात महाविद्यालये उघडावी लागतील. शासन ग्रामीण भागात महाविद्यालये सुरू करू शकत नाही. तेव्हा खासगी गुंतवणूकदार उघडतील. तेव्हा ते नफाच कमावणार आहेत. याठिकाणी आदिवासी, मागासवर्गीय, गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणात याविषयी काहीही आढळत नाही.

अध्यक्षीय समारोपासह पाहुण्यांचा परिचय डॉ. राम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. हंसराज जाधव यांनी केले. तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भालचंद्र वायकर, अधिसभा सदस्य डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. योगिता तौरे, डॉ. सतीश बडवे, प्राचार्य विवेक मिरगणे, प्राचार्य भारत खंदारे, डॉ. उल्हास उढाण, डॉ. मारोती तेगमपुरे आदींची उपस्थिती होती.

चौकट......

अस्वस्थतेला वाट करून देण्याचा प्रयत्न

देशात नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना देशातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, समाजातील तज्ज्ञ मंडळींना विचारात घेतलेले नाही. विविध विद्यार्थी संघटनांपैकी केवळ एबीव्हीपी संघटनेला विश्वासात घेतले. पाच-सहा कुलगुरूंना बोलावून बैठक घेतली. त्यामुळे हे शैक्षणिक धोरण सर्वांचे समाधान करणारे नाही. लोकसंवाद फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा अस्वस्थेला वाट करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अध्यक्षीय समारोपात डॉ. राम चव्हाण यांनी सांगितले.