शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुचकामी ठरली तरी आम्हाला ‘विदेशी’च हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात, म्हणून अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी ...

औरंगाबाद : फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात, म्हणून अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी झाडे लावली जातात; पण ही झाडे जैवविविधता नष्ट करत आहेत. त्यामुळे आतातरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी विनवणी एकीकडे निसर्गप्रेमी करत आहेत, तर दुसरीकडे मात्र वाढवायला कष्ट लागत नसल्याने कितीही कुचकामी ठरत असली, तरी आपल्याला विदेशी झाडेच हवी आहेत.

त्यामुळे खऱ्या अर्थाने जैवविविधता दिन साजरा करायचा असेल, तर सगळ्यात आधी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी सूचना पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पृथ्वीवरील जैवविविधता अफाट आहे. तिचा योग्य तो अभ्यास होऊन माहितीचा प्रसार झाला, तर या जैवविविधतेचे संरक्षण करता येईल. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघातर्फे २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

औरंगाबाद शहरातही विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात लावण्यात आलेली ८० टक्क्यांपेक्षाही जास्त झाडे विदेशी जातीची आहेत. यामध्ये ग्लिरिशिडिया, मोहगनी, रेन ट्री, नीलमोहर, पीतमोहर अशा झाडांचा समावेश आहे. या झाडांवर पक्षी, कीटक, किडे राहू शकत नाहीत तसेच या झाडांखाली वनस्पतीही उगवू शकत नाहीत. त्यामुळे ही जैवविविधता नष्ट करणारी झाडे लावू नयेत, असा इशारा निसर्गप्रेमी देत आहेत.

चौकट :

फक्त जंगले संरक्षित करा

जैवविविधता वाढीस लागण्यासाठी आपल्याला फार काही वेगळे करण्याची गरज नाही. स्वदेशी झाडे टिकली तर निसर्ग आपोआपच तिथे जैवविविधता तयार करत जातो. त्यामुळे आपल्याकडची झाडे, जंगले संरक्षित करा. त्यातील मानवी हस्तक्षेप थांबवा, म्हणजे आपोआपच जैवविविधता वाढीस लागेल. विदेशी झाडे जैवविविधतेला प्रचंड मारक आहेत. त्यामुळे या झाडांची लागवड थांबवली तरीही आपण जैवविविधतेला मोठा हातभार लावू शकतो. विदेशी झाडांच्या लागवडीवर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तशाप्रकारचा निर्णय औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रासाठीच घ्यावा.

- मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक

चौकट :

वादळात उन्मळली विदेशी झाडे

किनारपट्टीवर नुकत्याच येऊन गेलेल्या ताैक्ते वादळाच्या प्रलयात अनेक झाडे उन्मळून पडली. यापैकी जवळपास ७० टक्के झाडे ही विदेशी होती. विदेशी झाडांचे लाकूड अतिशय कुचकामी आणि ठिसूळ असते, हे याचे मुख्य कारण. यावरूनही विदेशी झाडे आपल्याकडे तग धरू शकत नाहीत, हे स्पष्ट होते.