शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कुचकामी ठरली तरी आम्हाला ‘विदेशी’च हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात, म्हणून अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी ...

औरंगाबाद : फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात, म्हणून अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी झाडे लावली जातात; पण ही झाडे जैवविविधता नष्ट करत आहेत. त्यामुळे आतातरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी विनवणी एकीकडे निसर्गप्रेमी करत आहेत, तर दुसरीकडे मात्र वाढवायला कष्ट लागत नसल्याने कितीही कुचकामी ठरत असली, तरी आपल्याला विदेशी झाडेच हवी आहेत.

त्यामुळे खऱ्या अर्थाने जैवविविधता दिन साजरा करायचा असेल, तर सगळ्यात आधी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी सूचना पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पृथ्वीवरील जैवविविधता अफाट आहे. तिचा योग्य तो अभ्यास होऊन माहितीचा प्रसार झाला, तर या जैवविविधतेचे संरक्षण करता येईल. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघातर्फे २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

औरंगाबाद शहरातही विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात लावण्यात आलेली ८० टक्क्यांपेक्षाही जास्त झाडे विदेशी जातीची आहेत. यामध्ये ग्लिरिशिडिया, मोहगनी, रेन ट्री, नीलमोहर, पीतमोहर अशा झाडांचा समावेश आहे. या झाडांवर पक्षी, कीटक, किडे राहू शकत नाहीत तसेच या झाडांखाली वनस्पतीही उगवू शकत नाहीत. त्यामुळे ही जैवविविधता नष्ट करणारी झाडे लावू नयेत, असा इशारा निसर्गप्रेमी देत आहेत.

चौकट :

फक्त जंगले संरक्षित करा

जैवविविधता वाढीस लागण्यासाठी आपल्याला फार काही वेगळे करण्याची गरज नाही. स्वदेशी झाडे टिकली तर निसर्ग आपोआपच तिथे जैवविविधता तयार करत जातो. त्यामुळे आपल्याकडची झाडे, जंगले संरक्षित करा. त्यातील मानवी हस्तक्षेप थांबवा, म्हणजे आपोआपच जैवविविधता वाढीस लागेल. विदेशी झाडे जैवविविधतेला प्रचंड मारक आहेत. त्यामुळे या झाडांची लागवड थांबवली तरीही आपण जैवविविधतेला मोठा हातभार लावू शकतो. विदेशी झाडांच्या लागवडीवर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तशाप्रकारचा निर्णय औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रासाठीच घ्यावा.

- मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक

चौकट :

वादळात उन्मळली विदेशी झाडे

किनारपट्टीवर नुकत्याच येऊन गेलेल्या ताैक्ते वादळाच्या प्रलयात अनेक झाडे उन्मळून पडली. यापैकी जवळपास ७० टक्के झाडे ही विदेशी होती. विदेशी झाडांचे लाकूड अतिशय कुचकामी आणि ठिसूळ असते, हे याचे मुख्य कारण. यावरूनही विदेशी झाडे आपल्याकडे तग धरू शकत नाहीत, हे स्पष्ट होते.