शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

पूर्णवेळ बाजारपेठा उघडण्याकडे उद्योगांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतील उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येत असली तरी पूर्णवेळ बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उद्योजकांनी उत्पादनासंबंधी सावध पवित्रा घेतला ...

औरंगाबाद : औरंगाबादेतील उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येत असली तरी पूर्णवेळ बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उद्योजकांनी उत्पादनासंबंधी सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, उत्पादित मालाला उठाव नसल्यामुळे ऑर्डरचे प्रमाणही ७० टक्क्यांवरच स्थिरावले आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उद्योगांनी गती घेतली होती. विस्कटलेले अर्थचक्र दिवाळीनंतर रुळावर येत होते. त्यानंतर औरंगाबादेत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले व मार्चनंतर पुन्हा दुसऱ्यांदा उद्योगांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी होती; पण बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमता ४०-५० टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या महिन्यात ७ तारखेपासून अनलॉक जाहीर करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार बाजारपेठांवर निर्बंध लावण्यात आले. मर्यादित वेळांसाठी बाजारपेठा सुरू असल्यामुळे उत्पादित मालाला फारसा उठाव नाही. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, औरंगाबादेतील ऑटोमोबाइल उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे उद्योगांनी सावध पवित्रा घेत मर्यादित स्वरूपातच उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली आहे. सद्य:स्थितीत औरंगाबादेतील उद्योगांची उत्पादन क्षमता ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

सध्या उद्योगांना कुशल कामगारांची टंचाई भासत आहे. लॉकडाऊनमध्ये परत गेलेले परप्रांतीय कामगार आता हळूहळू परतत असले तरी त्यांची संख्या खूप कमी आहे. आगामी गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय झाला, तर उद्योग गती घेतील, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

चौकट..

ऑटोमोबाइल उद्योगांना सर्वाधिक फटका

यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण अजगावकर यांनी सांगितले की, बाजारपेठांचे निर्बंध उठले, तर नागरिक खरेदीसाठी येतील व मालाला उठाव येईल. सध्या मालाला उठाव नसल्यामुळे उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. ऑर्डरचे प्रमाण ७० टक्क्यांवरच स्थिरावले आहे. कच्चामालदेखील वेळेवर उपलब्ध होत नाही. यासारख्या अनेक अडचणीतून उद्योग मार्ग काढत आहेत. बाजारपेठांवरील निर्बंधामुळे ऑटोमोबाइल उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे.