शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पूर्णवेळ बाजारपेठा उघडण्याकडे उद्योगांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतील उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येत असली तरी पूर्णवेळ बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उद्योजकांनी उत्पादनासंबंधी सावध पवित्रा घेतला ...

औरंगाबाद : औरंगाबादेतील उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येत असली तरी पूर्णवेळ बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उद्योजकांनी उत्पादनासंबंधी सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, उत्पादित मालाला उठाव नसल्यामुळे ऑर्डरचे प्रमाणही ७० टक्क्यांवरच स्थिरावले आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उद्योगांनी गती घेतली होती. विस्कटलेले अर्थचक्र दिवाळीनंतर रुळावर येत होते. त्यानंतर औरंगाबादेत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले व मार्चनंतर पुन्हा दुसऱ्यांदा उद्योगांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी होती; पण बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमता ४०-५० टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या महिन्यात ७ तारखेपासून अनलॉक जाहीर करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार बाजारपेठांवर निर्बंध लावण्यात आले. मर्यादित वेळांसाठी बाजारपेठा सुरू असल्यामुळे उत्पादित मालाला फारसा उठाव नाही. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, औरंगाबादेतील ऑटोमोबाइल उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे उद्योगांनी सावध पवित्रा घेत मर्यादित स्वरूपातच उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली आहे. सद्य:स्थितीत औरंगाबादेतील उद्योगांची उत्पादन क्षमता ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

सध्या उद्योगांना कुशल कामगारांची टंचाई भासत आहे. लॉकडाऊनमध्ये परत गेलेले परप्रांतीय कामगार आता हळूहळू परतत असले तरी त्यांची संख्या खूप कमी आहे. आगामी गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय झाला, तर उद्योग गती घेतील, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

चौकट..

ऑटोमोबाइल उद्योगांना सर्वाधिक फटका

यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण अजगावकर यांनी सांगितले की, बाजारपेठांचे निर्बंध उठले, तर नागरिक खरेदीसाठी येतील व मालाला उठाव येईल. सध्या मालाला उठाव नसल्यामुळे उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. ऑर्डरचे प्रमाण ७० टक्क्यांवरच स्थिरावले आहे. कच्चामालदेखील वेळेवर उपलब्ध होत नाही. यासारख्या अनेक अडचणीतून उद्योग मार्ग काढत आहेत. बाजारपेठांवरील निर्बंधामुळे ऑटोमोबाइल उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे.