शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उद्योग, आस्थापनांना ‘आरटीपीसीआर’साठी करावी लागणार व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:04 IST

अंशत: लॉकडाऊन: दर १५ दिवसांनी चाचणी करून प्रमाणपत्र ठेवावे लागणार औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: ...

अंशत: लॉकडाऊन: दर १५ दिवसांनी चाचणी करून प्रमाणपत्र ठेवावे लागणार

औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन करण्यात येणार असून या काळात ज्या उद्योग, आस्थापनांना परवानगी दिलेली आहे, त्यांना कर्मचारी, कामगारांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते, जेथे खासगी, औद्योगिक आस्थापना आहेत, तेथील कर्मचारी, कामगारांचे आरटीपीसीआर टेस्टिंग त्या आस्थापनांना करावे लागेल.

या निर्णयामुळे उद्योजक आणि दुकानदार, व्यापारी आणि खासगी आस्थापनांना कुठलीही स्पष्टता नव्हती. दरम्यान महापालिका प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांना संपर्क केला असता त्यांनी कळविले की, उद्योग आस्थापनांना स्वत: आरटीपीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था करावी लागेल. व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांना मनपाच्या टेस्ट सेंटरवर चाचणी करता येईल.

आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

ज्या आस्थापनांना ११ मार्च ते ४ एप्रिल या अंशत: लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे, त्या आस्थापनांशी संबंधित सर्व मालक, चालक, कर्मचारी, मजूर व तेथील कार्यरत सर्व व्यक्तींना कोरोनोच्या पार्श्वभूमीवर दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी वारंवार करणे बंधनकारक राहणार आहे तसेच नजीकच्या काळातील तपासणी अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या आदेशात नमूद केले आहे.

व्यापाऱ्यांसाठी मनपाचे लसीकरण केंद्र उपलब्ध

उद्योग आस्थापनांना आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. मात्र, व्यापारी आणि दुकानदार, कर्मचाऱ्यांना मनपाच्या टेस्टिंग सेंटरवर आरटीपीसीआर करण्याची सुविधा मिळणे शक्य होणार आहे. शनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. ११ मार्चपासून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी असलेल्या आस्थापना सुरू राहणार आहेत.