शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

सफाईसाठी लवकरच इंदौर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:50 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये मागील वर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २९९ वा आला होता. यंदाही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे एक पथक शहरातील साफसफाईचा आढावा घेण्यासाठी येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये मागील वर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २९९ वा आला होता. यंदाही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे एक पथक शहरातील साफसफाईचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. मागील वर्षी इंदौर शहराने देशभरात अव्वल क्रमांक मिळविला होता. त्याच धर्तीवर औरंगाबाद शहरातही साफसफाई करण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. प्रत्येक घरातून कचरा उचलण्यासाठी खाजगी एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सीएसआर फंड उभा करण्यात येईल.शहरातील कचरा प्रश्नावर महापालिकेला लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने वर्षानुवर्षे पडलेला कचरा नष्ट केला त्याच पद्धतीने नारेगाव येथील २० लाख टन कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे. नारेगाव येथील शेतकºयांनी मनपाला फक्त तीन महिने कचरा टाकण्याची मुभा दिली आहे. ही मुदत आता संपत आल्याने मनपाला त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. पुन्हा शेतकºयांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले तर मनपाची भयंकर कोंडी होणार आहे. कचरा नष्ट करण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यात येत आहे.दरम्यान, महापौरांसह पदाधिकाºयांनी मंगळवारी उद्योगपती राम भोगले यांची भेट घेऊन शहरातील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले की, भोगले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत महापालिका शहरातील कचºयावर प्रक्रिया करणे, वाहतूक, कचºयाचे डोअर टू डोअर कलेक्शन करणे यासाठी देशपातळीवरील इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविणार आहे. महापालिकेने यापूर्वी साफसफाईचे खासगीकरण करून रॅम्की कंपनीला नियुक्त केले होते. नगरसेवकांच्या वाढत्या तक्रारीनंतर कंपनीचे काम बंद करण्यात आले.सीएसआर फंडसाठी बैठक; कचºयापासून खत व इंधन निर्मितीचा पर्यायमहापौर घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राजू वैद्य, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी उद्योगपती भोगले यांची भेट घेतली. भोगले यांनी प्रत्येक वॉर्डात किंवा प्रभागात कचºयावर मशीनद्वारे प्रक्रिया करून ओल्या कचºयापासून खत व सुक्या कचºयापासून इंधननिर्मितीचा पर्याय मांडला.दोन ते अडीच टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे २५ लाखांचे मशीन उपलब्ध आहेत. त्यासाठी महापालिकेला पाणी, कर्मचारी व लाइटची व्यवस्था करावी लागेल. मशीन खरेदी करण्यासाठी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड मिळविण्याचा प्रयत्न करू असे भोगले यांनी आश्वासन दिले. त्यासाठी दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले.