शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ भरीव कामगिरी करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:24 IST

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. १ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले.

ठळक मुद्देमाजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग : हार्दिक पांड्या संघाची जमेची बाजू

औरंगाबाद : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.१ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले. युजरवेंद्रसिंग यांनी भारताच्या चार कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांना फलंदाजीत प्रभाव टाकता आला नसला तरी त्यांनी बंगळुरूयेथे १९७७ साली इंग्लंडविरुद्धच्या क्षेत्ररक्षणात चमक दाखवताना पदार्पणातच विक्रमी ५ झेल घेत त्या वेळेस ठसा उमटवला. मूळ राजकोट येथील असणाºया यजुरवेंद्रसिंग यांनी ७८ कसोटी सामन्यांत ९ शतकांसह ३७६५ धावा केल्या आहेत. २१४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाला या स्पर्धेत चांगली संधी आहे. पहिल्या चार संघांत ते असतील. तथापि, या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल. कारण अफगाणिस्तानसह सर्वच संघ तुल्यबळ आहे.’’ विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याविषयी मात्र, त्यांनी वेगळे मत व्यक्त केले. ‘‘कर्णधार म्हणून विराट कोहली अद्याप परिपक्व झालेला नाही. तथापि, रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याला मदतच होईल. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव यांचाही विचार करायला हवा होता. ऋषभ पंतवरदेखील अन्याय झाला आहे. तो मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील तज्ज्ञ खेळाडू आहे. अम्बाती रायुडूला फक्त एका मालिकेत अपयशी ठरल्याने वगळणे हेदेखील चूक आहे.’’ भारतीय अ संघाकडून प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंनी संघात संधी न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. युवा खेळाडूंना संधीच दिली नाही, तर त्यांच्यात प्रगती कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील वनडे स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू आहे; परंतु त्याची महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी शहीद भगतसिंह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. उद्धव भवलकर, सचिव दामोदर मानकापे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनंत नेरळकर यांनी केले.