शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ भरीव कामगिरी करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:24 IST

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. १ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले.

ठळक मुद्देमाजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग : हार्दिक पांड्या संघाची जमेची बाजू

औरंगाबाद : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.१ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले. युजरवेंद्रसिंग यांनी भारताच्या चार कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांना फलंदाजीत प्रभाव टाकता आला नसला तरी त्यांनी बंगळुरूयेथे १९७७ साली इंग्लंडविरुद्धच्या क्षेत्ररक्षणात चमक दाखवताना पदार्पणातच विक्रमी ५ झेल घेत त्या वेळेस ठसा उमटवला. मूळ राजकोट येथील असणाºया यजुरवेंद्रसिंग यांनी ७८ कसोटी सामन्यांत ९ शतकांसह ३७६५ धावा केल्या आहेत. २१४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाला या स्पर्धेत चांगली संधी आहे. पहिल्या चार संघांत ते असतील. तथापि, या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल. कारण अफगाणिस्तानसह सर्वच संघ तुल्यबळ आहे.’’ विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याविषयी मात्र, त्यांनी वेगळे मत व्यक्त केले. ‘‘कर्णधार म्हणून विराट कोहली अद्याप परिपक्व झालेला नाही. तथापि, रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याला मदतच होईल. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव यांचाही विचार करायला हवा होता. ऋषभ पंतवरदेखील अन्याय झाला आहे. तो मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील तज्ज्ञ खेळाडू आहे. अम्बाती रायुडूला फक्त एका मालिकेत अपयशी ठरल्याने वगळणे हेदेखील चूक आहे.’’ भारतीय अ संघाकडून प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंनी संघात संधी न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. युवा खेळाडूंना संधीच दिली नाही, तर त्यांच्यात प्रगती कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील वनडे स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू आहे; परंतु त्याची महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी शहीद भगतसिंह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. उद्धव भवलकर, सचिव दामोदर मानकापे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनंत नेरळकर यांनी केले.