शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ भरीव कामगिरी करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:24 IST

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. १ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले.

ठळक मुद्देमाजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग : हार्दिक पांड्या संघाची जमेची बाजू

औरंगाबाद : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.१ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले. युजरवेंद्रसिंग यांनी भारताच्या चार कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांना फलंदाजीत प्रभाव टाकता आला नसला तरी त्यांनी बंगळुरूयेथे १९७७ साली इंग्लंडविरुद्धच्या क्षेत्ररक्षणात चमक दाखवताना पदार्पणातच विक्रमी ५ झेल घेत त्या वेळेस ठसा उमटवला. मूळ राजकोट येथील असणाºया यजुरवेंद्रसिंग यांनी ७८ कसोटी सामन्यांत ९ शतकांसह ३७६५ धावा केल्या आहेत. २१४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाला या स्पर्धेत चांगली संधी आहे. पहिल्या चार संघांत ते असतील. तथापि, या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल. कारण अफगाणिस्तानसह सर्वच संघ तुल्यबळ आहे.’’ विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याविषयी मात्र, त्यांनी वेगळे मत व्यक्त केले. ‘‘कर्णधार म्हणून विराट कोहली अद्याप परिपक्व झालेला नाही. तथापि, रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याला मदतच होईल. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव यांचाही विचार करायला हवा होता. ऋषभ पंतवरदेखील अन्याय झाला आहे. तो मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील तज्ज्ञ खेळाडू आहे. अम्बाती रायुडूला फक्त एका मालिकेत अपयशी ठरल्याने वगळणे हेदेखील चूक आहे.’’ भारतीय अ संघाकडून प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंनी संघात संधी न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. युवा खेळाडूंना संधीच दिली नाही, तर त्यांच्यात प्रगती कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील वनडे स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू आहे; परंतु त्याची महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी शहीद भगतसिंह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. उद्धव भवलकर, सचिव दामोदर मानकापे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनंत नेरळकर यांनी केले.