शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

टाऊनशीपसाठी स्वतंत्र प्राधिकरण

By admin | Updated: July 3, 2017 00:59 IST

जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नियोजित टाऊनशीपच्या (कृषी समृद्धी केंद्र) विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नियोजित टाऊनशीपच्या (कृषी समृद्धी केंद्र) विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे टाऊनशीपमधील सुविधांचा प्रस्ताव, आराखडा व नियमावली तयार करण्याचे काम या पुढे प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, श्रीकृष्णनगर, गुंडेवाडी शिवारातील काही भागात नियोजित टाऊनशीप झाल्यास या परिसरात विकास कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधिकरणाची परवानी घ्यावी लागणार आहे.नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर २४ ठिकाणी सुनियोजित टाऊनशीप विकसित केल्या जाणार आहेत. टाऊनशीपसाठी अधिसूचित जमिनीवर औद्योगिक, कृषी विकास, शैक्षणिक, निवासी, असे झोन तयार करण्यात येणार आहेत. सदर झोनमध्ये करावयाच्या कामांचा आराखडा, विकास कामांची नियमावली तयार करण्याचे काम नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर या भागातील काही जमीन टाऊनशीपसाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुपिक व अकृषक जमिनी जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांकडून टाऊनशीपला विरोध केला जात आहे. शासनाचा नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा अध्यादेश शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात काही करायचे झाल्यास रस्ते विकास महामंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी हक्क बचाव समितीचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर यांनी केली आहे.