शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

पाऊस नसल्याने तापमानात वाढ

By admin | Updated: August 7, 2014 23:33 IST

पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे.

केज: पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात, मात्र जोराच्या वाहत्या वाऱ्यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातूर झाले आहेत.जून महिन्यात पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढले तर काही शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज घेतले. मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. त्यानंतर ७ जुलै रोजी पावसाला सुरुवात झाली. या दरम्यानच्या कालावधीत तीन-चार मोठे पाऊस पडले. याच पावसावर शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या घेतल्या. बियाण्यांची उगवण होताच पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकऱ्यांसमोर उभे राहिले. त्यामुळे त्यांनी गावांमधून पाणी आणून रोपांना टाकले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त आहेत अशातला भाग नाही. सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवरही होणार असल्याचा अंदाज येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. केज तालुक्यातील अनेक भागामध्ये नभ दाटून येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. महसूल कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तापमान २८ ते ३२ अंशाच्या आसपास नोंदविले जात आहे. पावसाळ्यात तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास असते. मात्र पाऊस नसल्याने वातावरण कोरडे झाले आहे. परिणामी तापमानही वाढत चालले आहे. पाऊस झाल्यास हवेत आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत नाही. यामुळे गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३२ अंशावर जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते. (वार्ताहर)