शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या संख्येत होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:38 IST

दैनंदिन कामकाजातील ताण-तणाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनाला जाणाºयांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून यासाठीच्या सुविधा थेट परभणीतच मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दैनंदिन कामकाजातील ताण-तणाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनाला जाणाºयांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून यासाठीच्या सुविधा थेट परभणीतच मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.२७ सप्टेंबर १९७० रोजी जागतिक पर्यटन संघटनेचे संविधान स्वीकारले गेले. त्यानंतर पर्यटनाविषयीची लोकप्रियता वाढत असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने २७ सप्टेंबर १९८० पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या ३६ वर्षापासून सातत्याने जागतिकस्तरावर पर्यटन दिन साजरा केला जातो. यानिमित्त देशात पर्यटन विभागाच्या वतीने वेगवेगळ्या थीमही राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनही पर्यटनाकडे गांभीर्याने पाहत आहे. या अनुषंगाने स्वतंत्र विभागही स्थापन करण्यात आला असून त्या विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना दिली जात आहे. एकीकडे शासकीयस्तरावरुन पर्यटनाला महत्त्व दिले जात असताना सर्वसामान्यांनाही पर्यटनाची ओढ लागली आहे. आजच्या धकधकीच्या काळात दैनंदिन कामकाजातून ताण-तणाव निर्माण होत असल्याने हा तणाव दूर करण्यासाठी मित्र, कुटुंबासह पर्यटनाला जाणाºयांची संख्या वाढू लागली आहे. या संदर्भात गेल्या ११ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलले परभणी येथील केसरी टुर्सचे एजंट नंदू तापडिया म्हणाले की, दरवर्षी परभणी शहरातून देशांतर्गत पर्यटनासाठी केरळ, जम्मू काश्मिर, राजस्थान, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, पंजाब आदी ठिकाणी जवळपास १ हजार नागरिक जातात. शिवाय विदेशातही परभणीतून दुबई, स्वीत्झलॅन्ड, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, नेपाळ आदी ठिकाणी ४०० ते ५०० नागरिक जातात. याशिवाय तिरुपती, दक्षिण भारत, वैष्णवी देवी, अमरनाथ, ब्रदीनाथ, केदारनाथ आदी धार्मिक स्थळावरही जाणाºयांची संख्या अधिक आहे. पर्यटनाला जाण्यासाठी काही खाजगी कंपन्यांचे पॅकेज उपलब्ध आहेत. याशिवाय स्वत:हून काही मंडळी फिरण्यासाठी जातात.यासाठी जवळपास ६ महिने अगोदरपासून बुकिंग केली जाते. देशात पर्यटनाला जाण्यासाठी कमीत कमी एका व्यक्तीला १८ हजार रुपये लागतात. सेवेचा दर्जा व येण्या-जाण्याचे माध्यम यावरुन खाजगी कंपन्यांकडून पर्यटनाचे पॅकेज ठरविले जाते, असेही नंदू तापडिया म्हणाले.