शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

रेशन दुकानांची संख्या वाढवा

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे, तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे नवीन रेशन कार्ड वाटप तात्काळ सुरु करावे, तसेच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात आयोजित अंबड-घनसावंगी तालुका अन्न सुरक्षा योजना आढावा बैठकीत बोलताना दिले. टोपे म्हणाले, अन्नसुरक्षा योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक आहे. प्रशासन, स्वस्त धान्य दुकानदार, सामान्य नागरिक सर्वांनी एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे पुरवठा करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याबाबत सर्वात जास्त तक्रारी या लाभार्थ्यांच्या यादीबाबत आहेत. लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत. वास्तविक लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने बनविण्याची आवश्यकता होती, मात्र हे काम स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आल्याने याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या. स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करुन नवीन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड तात्काळ वितरित करण्यात यावेत, सुधारित याद्या सार्वजनिक ठिकाणी, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी सामान्यांना पाहता येतील अशा ठिकाणी लावाव्यात, नवीन याद्या तयार झाल्यानंतर वाढीव लाभार्थ्यांचे वाढीव नियतन स्वस्त धान्य दुकानदारांना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची राहिल, दुकानदारांना तात्काळ वाढीव नियतन देण्यात यावे, अन्नसुरक्षा योजना सर्वसामान्य गरीब जनतेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी असल्याची जाणीव प्रशासनातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार आदींनी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दक्षता समिती, तलाठी, गावचे सरपंच आदींनी परिश्रम घेण्याची गरज आहे. हक्काचे धान्य मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होतो व त्याची झळ लोकप्रतिनिधींना सहन करावी लागते. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे अन्यथा प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आठवड्यातून किमान तीन दिवस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी ग्रामीण भागात जाऊन स्वस्त धान्य वाटपावर लक्ष ठेवावे. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार अहमद देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अंबडचे तहसीलदार महेश सावंत, घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, जि.प.सदस्य अ‍ॅड.संजय काळबांडे, दत्ता वाघ, नंदकुमार देशमुख, तात्यासाहेब चिमणे, मधुकर देशमुख, कपिल राऊत, रमेश पैठणे, रामदास कुरणकर, शिवाजी मस्के, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, अंबडचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, गोंदीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)नवीन रेशनकार्ड तात्काळ द्यावेनवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया थांबविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत. नवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये का थांबविण्यात आली आहे, हे समजत नाही. नवीन रेशनकार्ड देण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी. धान्य तस्कर दुकानदारांच्या सहाय्याने सामान्यांच्या हक्काचे धान्य मुंबई, पुणे आदी मोठया शहरांमध्ये काळया बाजारात पाठवितात. काळया बाजारात धान्य पाठविणे, चढ्या भावाने धान्य विक्री करणे कदापी खपवून घेतले जाणार नाही, अशा दुकानदार तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.