शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांची संख्या वाढवा

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे, तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे नवीन रेशन कार्ड वाटप तात्काळ सुरु करावे, तसेच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात आयोजित अंबड-घनसावंगी तालुका अन्न सुरक्षा योजना आढावा बैठकीत बोलताना दिले. टोपे म्हणाले, अन्नसुरक्षा योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक आहे. प्रशासन, स्वस्त धान्य दुकानदार, सामान्य नागरिक सर्वांनी एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे पुरवठा करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याबाबत सर्वात जास्त तक्रारी या लाभार्थ्यांच्या यादीबाबत आहेत. लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत. वास्तविक लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने बनविण्याची आवश्यकता होती, मात्र हे काम स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आल्याने याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या. स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करुन नवीन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड तात्काळ वितरित करण्यात यावेत, सुधारित याद्या सार्वजनिक ठिकाणी, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी सामान्यांना पाहता येतील अशा ठिकाणी लावाव्यात, नवीन याद्या तयार झाल्यानंतर वाढीव लाभार्थ्यांचे वाढीव नियतन स्वस्त धान्य दुकानदारांना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची राहिल, दुकानदारांना तात्काळ वाढीव नियतन देण्यात यावे, अन्नसुरक्षा योजना सर्वसामान्य गरीब जनतेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी असल्याची जाणीव प्रशासनातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार आदींनी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दक्षता समिती, तलाठी, गावचे सरपंच आदींनी परिश्रम घेण्याची गरज आहे. हक्काचे धान्य मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होतो व त्याची झळ लोकप्रतिनिधींना सहन करावी लागते. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे अन्यथा प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आठवड्यातून किमान तीन दिवस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी ग्रामीण भागात जाऊन स्वस्त धान्य वाटपावर लक्ष ठेवावे. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार अहमद देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अंबडचे तहसीलदार महेश सावंत, घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, जि.प.सदस्य अ‍ॅड.संजय काळबांडे, दत्ता वाघ, नंदकुमार देशमुख, तात्यासाहेब चिमणे, मधुकर देशमुख, कपिल राऊत, रमेश पैठणे, रामदास कुरणकर, शिवाजी मस्के, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, अंबडचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, गोंदीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)नवीन रेशनकार्ड तात्काळ द्यावेनवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया थांबविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत. नवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये का थांबविण्यात आली आहे, हे समजत नाही. नवीन रेशनकार्ड देण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी. धान्य तस्कर दुकानदारांच्या सहाय्याने सामान्यांच्या हक्काचे धान्य मुंबई, पुणे आदी मोठया शहरांमध्ये काळया बाजारात पाठवितात. काळया बाजारात धान्य पाठविणे, चढ्या भावाने धान्य विक्री करणे कदापी खपवून घेतले जाणार नाही, अशा दुकानदार तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.