शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांची ‘हद्द’वाढ !

By admin | Updated: January 23, 2015 00:56 IST

बीड : २०११ मध्ये नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार झाला. हद्दवाढीमुळे पालिकेशी जोडल्या गेलेल्या शहरानजीकच्या रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या

बीड : २०११ मध्ये नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार झाला. हद्दवाढीमुळे पालिकेशी जोडल्या गेलेल्या शहरानजीकच्या रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, तीन वर्षानंतरही या वस्त्यांपर्यंत नागरी सुविधा पोहोचल्याच नाही. इतकेच काय;पण; वीज, पथदिवे, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसाठीचा संघर्ष अजून संपलेला नाही.शहराची हद्द वाढली;पण तुलनेने विकास झाला नाही. त्यामुळे पालिकेने असुविधांची ‘हद्द’ केली, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हद्दवाढीतील भागांमध्ये गुरूवारी ‘लोकमत’ने स्पॉट रिपोर्टिंग केले़ त्याचाच हा आढावा़आमच्याकडून सर्व सोयीसुविधा पुरविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत़ रस्ते, नाल्या, वीज, पाणी या नागरी सुविधांना अधिक प्राधान्य देत आहोत़ नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आम्ही टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे़ यावर संपर्क साधून आपल्या तक्रारींची दखल घेत मार्गी लावण्या येतील़- श्रीकृष्ण भालसिंग, मुख्याधिकारीशहरातील चक्रधरनगर हा भाग समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. वीज, नाल्या, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांचाची येथे वाणवा आहे. नाल्या तर नाहीतच. प्रत्येकाच्या घरापुढे पाण्याचे डोह साचले आहेत. विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत. रस्ते धड नसल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. सिमेंट रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात़ उपाययोजना होत नाहीत़ तक्रारींची दखल घेतली जात नाही, असा पाढा रहिवाशांनी वाचला़नरसोबानगराला घाणीचा विळखा; आरोग्य धोक्यातनरसोबानगरात कचरा टाकण्यासाठी कुंडीच नाही. नागरिक उघड्या भूखंडांवरच कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. त्यामुळे डुकरांसह मोकाट गुरांचाही मुक्त संचार आहे. नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या गरजेच्या आहेत;परंतु अद्याप नाल्याही झाल्या नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी डबके साचले आहेत. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळू लागले असून आरोग्य धोक्यात आहे़अंधारामुळे चोरांचा सुळसुळाटगयानगर, शिंदेनगर, गया इस्टेट परिसरात पथदिवे नाहीत. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही अंधार असतो. त्यामुळे या भागात चोरांना मोकळे रान आहे. पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून जावे लागते. सायंकाळी सातनंतर महिला घराबाहेर पडत नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन छेडछाडही होते. त्यामुळे पथदिव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी आहे. या भागातील रस्त्यांचीही अतिशय वाईट स्थिती आहे़ मोठमोठे खड्डे पडल्याने पायी चालणेही जिकरीचे बनले आहे़ त्यामुळे अनेकजण रस्ता बदलून जाणे पसंत करतात़एकनाथनगरात बाराही महिने पाण्याचा ठणठणाटएकनाथनगर भागात झपाट्याने वसाहत वाढत आहे. मात्र, या भागात अद्याप नळजोडण्या नाहीत. त्यामुळे बोअरच्या क्षीरयुक्त पाण्यावरच बाराही महिने तहान भागवावी लागते. नळपट्टी मात्र न चुकता वसूल केली जाते. नळाचे पाणीच नाही तर नळपट्टी का द्यायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भागांत नाल्या कुठे झाल्या तर कुठे नाही. त्यामुळे रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. राजीव गांधी चौकापासून जोडलेल्या रस्त्याचे काम झाले;पण दोन्ही बाजूच्या पट्ट्यांचे काम रखडलेलेच आहे.