शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘त्या’ खुरट्या पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:27 IST

उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पुरात वाहून गेल्यामुळे चार दिवसांपूर्वीच एका तरुणाचा बळी गेला. त्यामुळे मनपाने या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सातारा व परिसरातील विविध वसाहतींना हा जवळचा मार्ग असल्याने याच रस्त्याने २४ तास गर्दी असते. या पुलावरून बाराही महिने पाणी वाहत असल्याने त्या पाण्यातून चालक वाहने पळवितात. रस्त्यावरून वाहणारे पाणी नागरिकांना कधी शंका आणणारे वाटले नाही. त्याविषयी कुणी प्रशासनाकडे रीतसर तक्रारदेखील केली नाही. त्यामुळे बिनबोभाटपणे रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते; परंतु नुकताच दुचाकीस्वार वाहून त्याचा बळी गेल्याने वाहनचालक आता पाण्यातून जाण्याची हिंमत करण्याचे टाळत आहेत.नाला ओलांडून शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, मंगल कार्यालय तसेच सातारा खंडोबा देवस्थान असल्याने दररोज शहरातून येणाºयांच्या गर्दीत खंड पडलेला नाही. महानगरपालिका हद्दीत असूनदेखील पुलासाठी काही उपाययोजना केल्या नसल्याने अपघाताचा प्रकार घडला आहे.जनतेसाठी मनपाने पाऊल उचलावे...सातारा व परिसरातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग असून, पंचक्रोशीतील नागरिक याच रस्त्याचा सर्रास वापर करीत आहेत; परंतु अपघाताची घटना घडल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. याच रस्त्यावर रुग्णालय असल्याने शहरातून बहुतांश नागरिक संग्रामनगर पुलाचा वापर टाळून उस्मानपुरा ते सातारा असा जुन्या रस्त्याचाच वापर करतात. महापालिका हद्दीत हा रस्ता मनपा स्थापनेपासून आहे; परंतु पूल बांधण्यासाठी पावले उचलली नसल्याची खंत माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल यांनी व्यक्त केली.महानगरपालिकेत मागणी लावून धरणार...जवळचा मार्ग असल्याने सातारा व तांडा परिसरातील नागरिक उस्मानपुरा रेल्वेगेटपासून एमआयटी सातारा रस्त्याचा वापर करतात. शहरातील ड्रेनेजचे सांडपाणी याच नाल्यातून बाराही महिने वाहत असते. विद्यार्थी, नागरिकांना या रस्त्याने जाताना असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्याकरिता मनपाच्या वतीने नाल्यात पूल बनवावा, अशी मागणी सातारा वॉर्डाच्या नगरसेविका सायली जमादार यांनी केली आहे.