शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

‘त्या’ खुरट्या पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:27 IST

उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पुरात वाहून गेल्यामुळे चार दिवसांपूर्वीच एका तरुणाचा बळी गेला. त्यामुळे मनपाने या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सातारा व परिसरातील विविध वसाहतींना हा जवळचा मार्ग असल्याने याच रस्त्याने २४ तास गर्दी असते. या पुलावरून बाराही महिने पाणी वाहत असल्याने त्या पाण्यातून चालक वाहने पळवितात. रस्त्यावरून वाहणारे पाणी नागरिकांना कधी शंका आणणारे वाटले नाही. त्याविषयी कुणी प्रशासनाकडे रीतसर तक्रारदेखील केली नाही. त्यामुळे बिनबोभाटपणे रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते; परंतु नुकताच दुचाकीस्वार वाहून त्याचा बळी गेल्याने वाहनचालक आता पाण्यातून जाण्याची हिंमत करण्याचे टाळत आहेत.नाला ओलांडून शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, मंगल कार्यालय तसेच सातारा खंडोबा देवस्थान असल्याने दररोज शहरातून येणाºयांच्या गर्दीत खंड पडलेला नाही. महानगरपालिका हद्दीत असूनदेखील पुलासाठी काही उपाययोजना केल्या नसल्याने अपघाताचा प्रकार घडला आहे.जनतेसाठी मनपाने पाऊल उचलावे...सातारा व परिसरातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग असून, पंचक्रोशीतील नागरिक याच रस्त्याचा सर्रास वापर करीत आहेत; परंतु अपघाताची घटना घडल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. याच रस्त्यावर रुग्णालय असल्याने शहरातून बहुतांश नागरिक संग्रामनगर पुलाचा वापर टाळून उस्मानपुरा ते सातारा असा जुन्या रस्त्याचाच वापर करतात. महापालिका हद्दीत हा रस्ता मनपा स्थापनेपासून आहे; परंतु पूल बांधण्यासाठी पावले उचलली नसल्याची खंत माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल यांनी व्यक्त केली.महानगरपालिकेत मागणी लावून धरणार...जवळचा मार्ग असल्याने सातारा व तांडा परिसरातील नागरिक उस्मानपुरा रेल्वेगेटपासून एमआयटी सातारा रस्त्याचा वापर करतात. शहरातील ड्रेनेजचे सांडपाणी याच नाल्यातून बाराही महिने वाहत असते. विद्यार्थी, नागरिकांना या रस्त्याने जाताना असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्याकरिता मनपाच्या वतीने नाल्यात पूल बनवावा, अशी मागणी सातारा वॉर्डाच्या नगरसेविका सायली जमादार यांनी केली आहे.