शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ताप रूग्णांत वाढ

By admin | Updated: September 20, 2014 00:06 IST

नांदेड : वातावरणातील बदल व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

नांदेड : वातावरणातील बदल व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत आठ महिन्यांत डेंग्यूचे २२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत़ तर साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त आहेत़ यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक भागात अळीनाशक औषधी फवारणी करण्यात आली नाही़ शहरात स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत़ तुंबलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी येत आहे़ त्यामुळे डासांची उत्पती निर्माण होवून साथरोगांना निमंत्रण मिळत आहे़ अनेक भागातील लहान मुले, जेष्ठ नागरिकांना साथीचे आजार होत आहेत़ ताप, सर्दी, खोकला या आजाराने नागरिक त्रस्त आहेत़ गेल्या काही महिन्यापासून डेंग्यूने डोके वर काढले आहे़ आतापर्यंत २२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे नोंद शासकीय रूग्णालयात आहे़ यातील काही रूग्ण बरे झाले असून एका रूग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ़ मीरा कुलकर्णी यांनी दिली़ त्या म्हणाल्या, सध्या वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग आढळून आले आहेत़ महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रचार टाळण्यासाठी प्रभागनिहाय अळीनाशक औषधी फवारणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या भागात धुर व औषधी फवारणी करण्यात येत आहे़ तसेच कंटेनर पाहणी मोहीमही सुरू आहे़ स्वयंसेवक घरोघर भेटी देवून नागरिकांच्या घरातील पाणीसाठे तपासणी करत आहेत़ घरातील कुलर, टायर, सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत़ त्यामुळे अशा पाणीसाठ्यावर डासांची निर्मिती होवून साथीचे आजार बळावत आहेत़ यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे़ डॉ़ प्रमोद अंबाळकर म्हणाले, शहरात सध्या विषाणूजन्य आजारांचे रूग्ण वाढले असून गॅस्ट्रो, डेंग्यू, कावीळ, मलेरीया आदी आजारामुळे रूग्णालयात गर्दी होत आहे़ विशेषत: ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या अधिक असून शहरातील अविकसीत भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत़ महिन्यातून दोन, तीन रूग्ण डेंग्यूचे आढळत आहेत़ या रूग्णांना शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)