औरंगाबाद : घाटीत रुग्णालयात गेल्या १३ दिवसांत चौथ्यांदा मंगळवारी (दि.१०) २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर खाजगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाच्या ७२ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ७५ रुग्णांना सुटी देण्यात आली.
घाटी रुग्णालयात तब्बल १७० दिवसांनी २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर रोजी कोरोना रुग्णांच्या मृत्यूला ब्रेक लागला होता. या दोन दिवसांनंतर घाटीत पुन्हा मृत्यूचक्र सुरू झाले; परंतु ८ दिवसांनंतर ८ नोव्हेंबर रोजी घाटीसह अन्य कोणत्याही रुग्णालयात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. घाटीत मंगळवारी पुन्हा एकही मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुगणांची संख्या ४१,२१२ झाली आहे. यातील ३९,४३१ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर एकूण १,१०८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ६७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७२ रुग्णांत मनपा हद्दीतील ५८, ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४९ आणि ग्रामीण भागातील २६ अशा ७५ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शहरातील एका खासगी रुग्णालयात एसबीओए शाळेसमोरील ७३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण-५८
भगतसिंगनगर ३, सिडको १, हर्सूल १, गणेशनगर १, विष्णूनगर १, खिवंसरानगर १, रणजीतनगर, काल्डा कॉर्नर १, साराराजनगर, गारखेडा १, डिलक्सनगर १, व्यंकटेशनगर १, घाटी परिसर १, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर १, सिडको, एन-सहा १, नाईकनगर १, शांतिनिकेतन कॉलनी, त्रिमूर्ती चौक १, एन-नऊ, रायगडनगर १, वेदांतनगर १, एसबीआय, औरंगाबाद शाखा १, अहिंसानगर १, केसरसिंग पार्क २, दिवाणदेवडी १, अन्य ३४.
ग्रामीण भागातील रुग्ण-१४
रांजणगाव (पोळ) १, रामनगर, पैठण १, साईनगर, बजाजनगर १, माऊली हॉस्पिटल, पैठण १, लासूर रोड, गंगापूर १, सिलेगाव १, गंगापूर १, अन्य ७.