शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

५६ कोरोना रुग्णांची वाढ, ६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे. यातील ४२,२७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५६ रुग्णांत मनपा हद्दीतील ४५, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१ आणि ग्रामीण भागातील २५, अशा ९६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. पडेगावातील ५२ वर्षीय पुरुष, हर्सूल पिसादेवी रोड येथील ६१ वर्षीय पुरुष, चौका येथील ६० वर्षीय पुरुष, एन-११ नवजीवन कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुष, द्वारकानगरातील ७२ वर्षीय स्त्री, अजबनगरातील ७० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

उस्मानपुरा १, रेल्वे स्टेशन १, छावणी परिसर १, एन-३ सिडको १, उल्कानगरी १, बीड बायपास १, रामनगर २, पहाडसिंगपुरा १, रेल्वे स्टेशन परिसर २, मछली खडक १, आविष्कार कॉलनी १, ईटखेडा १, अयोध्यानगर १, मध्यवर्ती बसस्थानक परिसर १, हरिप्रसादनगर १, एन-११ सिडको १, हर्सूल १, शाहनूरवाडी १, अन्य २५.

ग्रामीण भागातील रुग्ण

मुधलवाडी, पैठण १, अन्य १०.