शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

जिल्ह्यात ४८ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५० खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात ४८ रुग्णांची वाढ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५० खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात ४८ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १९, ग्रामीण भागातील २९ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहरातील नव्या रुग्णांची संख्या सलग १३व्या दिवशी २० खाली राहिली. त्यातही सक्रिय म्हणजे उपचार सुरू असलेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्याही ५० खाली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४१४ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ५२८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ६२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १२ आणि ग्रामीण भागातील ३७ अशा ४९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, पैठण येथील २८ वर्षीय महिला, शहरातील शंभूनगर, गादिया विहार येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी १, ईटखेडा पैठण रोड १, संदेशनगर २, धूत हॉस्पिटलजवळ १, एन-७ येथे १, सातारा परिसर २, एसआरपीएफ कॅम्प १, चिकलठाणा १, जयभवानीनगर १, अन्य ८.

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद २, गंगापूर ८, खुलताबाद १, वैजापूर १५, पैठण ३.