शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

जिल्ह्यात १४३ कोरोना रुग्णांची वाढ, १९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या दोन हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ९४६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ८५ आणि ग्रामीण भागातील १९८, अशा २८३ रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्युदर ९.७९ टक्के राहिला.

उपचार सुरू असताना पाचोड, पैठण येथील ५९ वर्षीय पुरुष, हडको कॉर्नर येथील ७६ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६२ वर्षीय महिला, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, गंगापूर येथील ३० वर्षीय महिला, दौलताबाद येथील ४२ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, शेवगाव, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, लोहगाव, कन्नड येथील ४० वर्षीय महिला, आंबेडकरनगर येथील ६८ वर्षीय महिला, रशीदमामू कॉलनीतील ६५ वर्षीय महिला, स्टेशनरोड परिसरातील ६६ वर्षीय महिला आणि तळवाडा येथील ५६ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

जाधववाडी १, म्हाडा कॉलनी १, जालाननगर १, चिकलठाणा ३, अन्य ३२

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ३, रांजणगाव २, हेरडपुरी, ता. पैठण २, सिडको वाळूज महानगर-१ येथे १, लोकमान्य चौक १, कासोदा, ता. गंगापूर १, अन्य ९५