शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जिल्ह्यात १४३ कोरोना रुग्णांची वाढ, १९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या दोन हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ९४६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ८५ आणि ग्रामीण भागातील १९८, अशा २८३ रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्युदर ९.७९ टक्के राहिला.

उपचार सुरू असताना पाचोड, पैठण येथील ५९ वर्षीय पुरुष, हडको कॉर्नर येथील ७६ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६२ वर्षीय महिला, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, गंगापूर येथील ३० वर्षीय महिला, दौलताबाद येथील ४२ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, शेवगाव, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, लोहगाव, कन्नड येथील ४० वर्षीय महिला, आंबेडकरनगर येथील ६८ वर्षीय महिला, रशीदमामू कॉलनीतील ६५ वर्षीय महिला, स्टेशनरोड परिसरातील ६६ वर्षीय महिला आणि तळवाडा येथील ५६ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

जाधववाडी १, म्हाडा कॉलनी १, जालाननगर १, चिकलठाणा ३, अन्य ३२

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ३, रांजणगाव २, हेरडपुरी, ता. पैठण २, सिडको वाळूज महानगर-१ येथे १, लोकमान्य चौक १, कासोदा, ता. गंगापूर १, अन्य ९५