शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

४ कोटी खर्चुनही अशुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावास जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ९२ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे़

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावास जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ९२ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे़ मात्र नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावची लोकसंख्या १२ हजारांवर आहे़ जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या हंडरगुळी गावात मोठी बाजारपेठ आहे़ त्यामुळे येथे व्यापारी व शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते़ गावाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाने २००८-०९ मध्ये जलशुुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले़ तिरू प्रकल्पावरून ही योजना कार्यान्वित आहे़ कसेबसे तीन-चार वर्षे रेंगाळत या योजनेचे काम पूर्णत्वाकडे नेले़ त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली़ या योजनेच्या माध्यमातून नवीन जलकुंभ, पाईपलाईन, तिरू प्रकल्पात उर्ध्वविहिर, गावाशेजारी जलशुद्धकीरण केंद्र बांधण्यात आले़ जलधुध्दीकरण यंत्र बसविल्यावरही शुद्ध पाणी मिळत नसल्याची ग्रामस्थांतून ओरड आहे़ बहुतांश ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप, आड, विहिर, विंधन विहिर आदीचा आधार घेत आहेत़ नळाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता सांडपाणी म्हणून केला जात आहे़ अशातच ग्रामपंचायतीने २०११ पासून पाणीपट्टी ३० वरून ८० रूपयावर वाढ केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे़यासंदर्भात विस्तार अधिकारी ए़पी़पाटील म्हणाले, वर्षभरापासून फिल्टर बंद आहे़ त्यामुळे पाणी गढूळ येत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे़ याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे आपण अहवाल पाठविला आहे़ तसेच तक्रारकर्त्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे़ (वार्ताहर)वर्षभरानंतर प्रशासनाकडून दखलहंडरगुळी गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार गावातील प्रा़ शिवाजी माने, रमाकांत लांडगे, संजय काळवणे यांनी पंचायत समितीकडे केली होती़ तक्रार देऊन वर्ष संपल्यावर उदगीर पंचायत समितीच्या पथकाने नुकतीच गावाला भेट देऊन पाणी नमुने घेतले आहेत़ सध्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विंधन विहिरी व खासगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे़ पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढली असली तरी जलशुद्धीकरण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे़