शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्रशासनात असमन्वय; व्यापाऱ्यांचा मानसिक, आर्थिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनातील असमन्वयामुळे व्यापाऱ्यांचा सोमवारी दिवसभर मानसिक छळ झाला. १ जूनपासून शहरात लॉकडाऊनचे ...

औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनातील असमन्वयामुळे व्यापाऱ्यांचा सोमवारी दिवसभर मानसिक छळ झाला. १ जूनपासून शहरात लॉकडाऊनचे चित्र कसे असेल, याबाबत जिल्हा प्रशासन, मनपा, पोलीस प्रशासनाचे एकमत होण्यासाठी पूर्ण दिवस गेला; परंतु काहीही माहिती समोर आली नाही. या सगळ्या गदारोळात लोकप्रतिनिधींनी दिवसभरात या प्रकरणात काहीही लक्ष घातले नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ दुकान उघडी राहिले तर ती दुकाने सील करण्यात आली. ३०० च्या आसपास दुकाने दीड महिन्यात सील केली गेली. त्यांचे आर्थिक नुकसान झालेच, शिवाय मानसिक त्रासदेखील त्यांना सहन करावा लागला.

१ जूनपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन कसे असेल याबाबत ३० मे रोजी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, फळविक्रेते आणि मजूर, कामगारांचे लक्ष प्रशासकीय निर्णयाकडे लागले. सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे दुपारनंतर निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती; परंतु दिवसभरात काहीही निर्णय न झाल्यामुळे शहर व जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांची घालमेल सुरू होती.

जिल्हाधिकारी दुपारी म्हणाले....

लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना १ जूननंतर लॉकडाऊन कसे असेल याबाबत विचारले असता ते म्हणाले, शासनाच्या आदेशाचे पालन केले जाईल. मनपा, पोलीस, जि.प. यंत्रणेशी चर्चा करून निर्णय होईल. लोकप्रतिनिधींनीदेखील लॉकडाऊनमध्ये सवलत देण्याबाबत मागणी केली आहे. सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सर्व व्यवहारांना मुभा द्यायची की दिवसाआड परवानगी द्यायची किंवा ५० टक्के बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यायचा, याबाबत चर्चेअंती सर्वंकष निर्णय होईल.

जिल्हाधिकाऱ्यांची सायंकाळी भूमिका अशी

प्रशासनाने काहीही निर्णय घेतला नसल्यामुळे व्यापारी संतापले होते. याबाबत सायंकाळी जिल्हाधिकारी चव्हाण यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ज्यांनी सील काढून दुकाने उघडली असतील त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल होतील. लॉकडाऊन शिथिल करताना निर्णय घेण्याचे निश्चित झाले आहे. जे व्यापारी महापालिकेत गेले आहेत, त्यांच्याबाबतदेखील निर्णय होणारच आहे.

सील केलेल्या दुकानांचा निर्णय अधांतरी

दुकानांचे सील काढण्यासंदर्भात, जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, सुनावणी घेऊन दंडात्मक कारवाईनंतर सील उघडण्याचा निर्णय होईल; परंतु हा निर्णय कधी होणार, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. दरम्यान, व्यापाऱ्यांची दिवसभर मनपातून जिल्हाधिकारी कार्यालय अशी धावपळ सुरू होती. काही भागांत दुकाने सील केल्यानंतर ती उघडण्यात आली.