शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवकाळी पावसात तेरा गुरांचा बळी

By admin | Updated: March 1, 2016 23:52 IST

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत फळबागा व रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत फळबागा व रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करून कृषी व महसूल विभागाने संयुक्त अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिला आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. २८ फेब्रुवारी रोजी ३.२0 मिमी पावसाची नोंद झाली. तर एक लहान जनावर दगावले होते. आडगाव, भिंगी, लिंबाळा परिसरात गारपीट झाली होती. सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला होता. २९ रोजी मात्र हिंगोली व औंढा तालुक्यात गारपीट झाली. यात टाकळी, दुर्गधामणी, समगा, औंढा तालुक्यात येळी फाटा, सिद्धेश्वर भागात गारपीट झाली. तर मोठी जनावरे तीन व लहान ९ जनावरे दगावली. शिवाय २ मोठी जनावरे जखमी झाली. वीज पडून आसोंदा येथील दोघे जखमीही झाले आहेत.यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवाजी पवार यांना विचारले असता कृषी व महसूल विभागाकडून संयुक्त पाहणी सुरू आहे. त्याचा अहवाल तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी संयुक्तपणे देणार आहेत. त्यानंतरच नुकसानीची स्थिती कळणार आहे. मात्र यात १0 ते १५ टक्के नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचे ते म्हणाले. फळबागा, कांदा, गहू, भाजीपाल्याचा यात समावेश आहे. . (जिल्हा प्रतिनिधी)