शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: October 15, 2016 01:23 IST

औरंगाबाद : चार वर्षांच्या खंडानंतर बहुप्रतीक्षित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.

औरंगाबाद : चार वर्षांच्या खंडानंतर बहुप्रतीक्षित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. वेरूळ लेणीच्या साक्षीने दीप प्रज्वलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची तेजोमय सुरुवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव वल्सा नायर, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, पुढील वर्ष हे ‘व्हिजिट महाराष्ट्र- २०१७’ साजरे करण्यात येणार आहे. देश-विदेशातील जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात यावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील पर्यटनाच्या व्यवसायाला गती देण्यासाठी येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच टुरिझम सर्किट करण्यात येणार आहे. पर्यटनाचे सहसंचालनालयाचे कार्यालय या शहरात आणण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मी चीन दौऱ्यावर असताना तेथील ‘ड्युन हाँग’ या शहरास भेट दिली. तेथे अजिंठ्यासारख्या लेण्या आहेत. तेथे अशी माहिती मिळाली की, औरंगाबादेतील अजिंठा लेणी पाहून १ हजार वर्षांपूर्वी एक व्यक्ती ‘ड्युन हाँग’ येथे आला व तेथील लोकांच्या सहकार्याने अजिंठ्यासारखी प्रतिकृती तयार केली. चीनने जोरदार मार्केटिंग करून तेथे पर्यटक वाढविले. मात्र, औरंगाबादेतील अजिंठा, वेरूळ लेणी अस्सल आहेत. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी मार्केटिंग तेवढ्याच ताकदीने करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. वेरूळ-अजिंठा या जागतिक वारसामुळे देशात दिल्ली, आग्रानंतर औरंगाबादची एकाच वेळी तुलना होते, असा गौरव करून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रास्ताविक केले. पर्यटनाची शृंखला आहे. पर्यटनाच्या विकासासाठी अतिथी देवो भव: चे वातावरण निर्माण झाले पाहिजे. यात रिक्षावाले, टॅक्सीवाले हे ब्रँड अ‍ॅम्बेसीडर असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, मपविमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, महोत्सवाचे समन्यवक व महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहसंचालक सतीश सोनी, पारस बोथरा यांनी केले.