शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: October 15, 2016 01:23 IST

औरंगाबाद : चार वर्षांच्या खंडानंतर बहुप्रतीक्षित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.

औरंगाबाद : चार वर्षांच्या खंडानंतर बहुप्रतीक्षित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. वेरूळ लेणीच्या साक्षीने दीप प्रज्वलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची तेजोमय सुरुवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव वल्सा नायर, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, पुढील वर्ष हे ‘व्हिजिट महाराष्ट्र- २०१७’ साजरे करण्यात येणार आहे. देश-विदेशातील जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात यावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील पर्यटनाच्या व्यवसायाला गती देण्यासाठी येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच टुरिझम सर्किट करण्यात येणार आहे. पर्यटनाचे सहसंचालनालयाचे कार्यालय या शहरात आणण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मी चीन दौऱ्यावर असताना तेथील ‘ड्युन हाँग’ या शहरास भेट दिली. तेथे अजिंठ्यासारख्या लेण्या आहेत. तेथे अशी माहिती मिळाली की, औरंगाबादेतील अजिंठा लेणी पाहून १ हजार वर्षांपूर्वी एक व्यक्ती ‘ड्युन हाँग’ येथे आला व तेथील लोकांच्या सहकार्याने अजिंठ्यासारखी प्रतिकृती तयार केली. चीनने जोरदार मार्केटिंग करून तेथे पर्यटक वाढविले. मात्र, औरंगाबादेतील अजिंठा, वेरूळ लेणी अस्सल आहेत. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी मार्केटिंग तेवढ्याच ताकदीने करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. वेरूळ-अजिंठा या जागतिक वारसामुळे देशात दिल्ली, आग्रानंतर औरंगाबादची एकाच वेळी तुलना होते, असा गौरव करून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रास्ताविक केले. पर्यटनाची शृंखला आहे. पर्यटनाच्या विकासासाठी अतिथी देवो भव: चे वातावरण निर्माण झाले पाहिजे. यात रिक्षावाले, टॅक्सीवाले हे ब्रँड अ‍ॅम्बेसीडर असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, मपविमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, महोत्सवाचे समन्यवक व महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहसंचालक सतीश सोनी, पारस बोथरा यांनी केले.