शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

संत साहित्य संमेलनाचे अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: May 27, 2017 23:11 IST

लातूर : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातुरात २९ ते ३० मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातुरात २९ ते ३० मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २९ मे रोजी सकाळी ९़३० वाजता होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक हभप विठ्ठल पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली़यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसकर, खा़डॉ़सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जि़प़ अध्यक्ष मिलिंद लातुरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, महापौर सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ यापूर्वी नाशिक, नवी मुंबई, शेळगाव, नांदेड व पुणे येथे संमेलने झाली़ आता लातूरमध्ये साहित्य संमेलन होत आहे़ २९ मे रोजी सकाळी ७ वाजता दिंडीने संमेलनाला सुरूवात होईल़ माजी मंत्री आ़ दिलीपराव देशमुख, आ़राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होणार आहे़ एकूण सात सत्रात होणाऱ्या साहित्य संमेलनात शेतकरी आत्महत्या रोखणे, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, हुंडामुक्ती विवाह, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती आदी ज्वलंत विषयांवर परिसंवाद होणार आहेत़ साहित्य संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव सुमित मलिक, आ़अमित देशमुख, महसूल आयुक्त, डॉ़चंद्रकांत दळवी, आयुक्त डॉ़ पुरूषोत्तम भापकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली़ पत्रपरिषदेला संमेलनाध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, दादा महाराज शिरवळकर, माधव महाराज शिवणीकर यांची उपस्थिती होती़