शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्याकडून शिवसेनेला दुसरा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:38 IST

जातीपातीचे गणित आणि या गणिताची जुळवणूक यावरच झाली निवडणूक

ठळक मुद्देहर्षवर्धन जाधव यांनी पाडलेल्या भगदाडातून इम्तियाज यांचा विजयी प्रवेशराज्यातील वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याची किमया

- नजीर शेख 

दलित- मुस्लिम मतांची एकजूट आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे राज्यात सर्वाधिक चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद  लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला धक्का दिला. राज्यातील वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याची किमया इम्तियाज जलील यांनी केली. 

औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत झाली. गेल्या वीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला राखला होता. खैरे यांना पराभूत करू शकेल, एवढी ताकद असलेला उमेदवार विरोधकांना आतापर्यंत मिळालेला नव्हता. इम्तियाज जलील यांनी २०१४ मध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघात एमआयएमकडून अनपेक्षितपणे विजय मिळवून शिवसेना- भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर अवघ्या साडेचार वर्षांत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा धक्का दिला. अर्थात, या मतदारसंघात यावेळी कधी नव्हे एवढी दलित आणि मुस्लिम मतांची एकजूट झाल्याचे कारणही खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले. त्याच्या जोडीलाच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारीही खैरे यांना घातक ठरली. 

चार वेळा विजयी झालेल्या खैरे यांच्याविरुद्ध यावेळी वातावरण असल्याची जोरदार चर्चा मतदानाआधी होती. मतदान झाल्यानंतरही खैरे आणि जलील यांच्यातच लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तर मतदान संपताच फटाके फोडले होते. तरीही खैरे यांचाच विजय होईल, अशी सार्वत्रिक चर्चा होती. मात्र, ही चर्चा निकालाअंती फोल ठरली. राज्यात वंचित आघाडीने यंदाच्या निवडणुकीत दलित- मुस्लिम आणि बहुजन यांच्या आघाडीचा प्रयोग स्वबळावर राबविण्याचे ठरविले. या प्रयोगाची औरंगाबादेतील चाचणी यशस्वी ठरली.  

सेनेने आणि विशेषकरून खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीला पहिल्या टप्प्यात फारसे गांभीर्याने घेतले नाही. दीड वर्षापासून जाधव हे सातत्याने निवडणूक लढविण्याची आणि खैरेंचा पराभव करण्याची भाषा बोलत होते. आपले गाऱ्हाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावरही घातले होते; परंतु शिवसेनेने खैरे यांनाच पाठबळ दिले.  इम्तियाज जलील यांच्या रूपाने का होईना खैरे यांचा पराभव झाल्याने  जाधव यांना मोठा आनंद झाल्याचे निकालानंतर त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले. 

खरे तर काँग्रेस आणि हर्षवर्धन जाधव यांना थोपविण्यासाठी शिवसेनेकडून ‘आमची लढत एमआयएमशी आहे’ असे मुद्दामहून सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात एमआयएमने खैरे यांना अखेरच्या क्षणापर्यंत झुंजविल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. मतदानानंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी आपले काम न केल्याचा ठपका ठेवत तशी तक्रारही खैरे यांनी पक्षप्रमुखांकडे, त्याचप्रमाणे भाजपकडे केली होती. खैरे यांची शंका प्रत्यक्षात खरी होती की काय, असे आता निकालानंतर वाटू लागले आहे. या मतदारसंघात जात आणि धर्माची सरळ विभागणी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. औरंगाबाद  शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची नाराजी याबद्दल निवडणुकीआधी चर्चा झाली. मात्र, या मुद्यांपेक्षा जातीपातीचे गणित आणि या गणिताची जुळवणूक यावर ही निवडणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

स्कोअर बोर्डशेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत जलील यांनी केवळ ४,४९२ मतांनी खैरे यांच्यावर विजय मिळविला. हर्षवर्धन जाधव यांनी २ लाख ८३ हजार ७९८ मते घेत खैरेंच्या बालेकिल्याला भगदाड पाडले. त्या भगदाडातून जलील यांनी ३ लाख ८९ हजार ४२ मते घेत विजयी प्रवेश केला, तर खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मतांवर समाधान मानावे लागले. या तीन उमेदवारांच्या गदारोळात काँग्रेस पक्ष मात्र पार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. आ. सुभाष झांबड यांना केवळ ९१ हजार ७८९ इतकीच मते पडली. 

चंद्रकांत खैरेंच्या पराभवाची कारणे- हर्षवर्धन जाधव यांना रोखण्यात अपयश.- वीस वर्षांच्या खासदारकीनंतर विरोधाचे वातावरण. - स्वपक्षीयांची मनापासून साथ मिळाली नाही.- वंचित आघाडीचा नियोजनबद्ध भूमिगत प्रचार. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल