शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे प्रकल्प दिल्लीत रखडले!

By admin | Updated: June 19, 2017 00:39 IST

औरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागला आहे.

विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागला आहे. प्रस्तावित कामे बीओटीवर करायची की, ईपीसीवर याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ती कामे सध्या कागदावरच अडकून पडल्याची माहिती विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) आणि ईपीसी (इंजिनिअरिंग प्रॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन्स) यापैकी कोणत्या पर्यायाने ती कामे करायची यासाठी एनएचएआयच्या नागपूर विभागीय कार्यालयात वारंवार बैठकीचे सत्र सुरू आहे. परंतु त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. ईपीसीमध्ये कंत्राटदार डिझाईनपासून बांधकामांपर्यंत सर्व कामे करतो. ती बीओटीमध्ये टोल वसुली करण्याचा प्रकार असतो. खाजगीकरणातून प्रकल्पनिर्मिती होते. राज्यातील अकोला, नागपूर, खामगाव, सोलापूर, औरंगाबादमधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय होत नसल्याने ती कामे रेंगाळली आहेत.औरंगाबादमधील जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या कामांचा डीपीआर देऊन वर्ष होत आले आहे. त्या कामाला मंजुरी देण्यात आली असली तरी निविदा प्रक्रियेकडे ती कामे सरकलेली नाहीत. मध्यंतरी एनएचएआयने काही कामांच्या बीओटीच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अ‍ॅन्युटीवर निविदा प्रसिद्धीस दिल्या. परंतु अ‍ॅन्युटीच्या निविदांनादेखील प्रतिसाद मिळाला नाही. एक निविदा आल्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याची वेळ आली.