शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

अनलॉकसंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:04 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने पाच टप्प्यांत कडक निर्बंध उठविण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपत्ती व्यवस्थापन ...

औरंगाबाद : राज्य शासनाने पाच टप्प्यांत कडक निर्बंध उठविण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपत्ती व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत कोण कोणते निर्बंध हटविण्यात येतील, यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या स्तरात येईल. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी २०.३४ टक्के ऑक्सिजन बेड भरलेले होते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ५.३८ टक्के होता. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट जवळपास १२ टक्क्यांपर्यंत जातो. दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट गृहीत धरला तर तो साधारणपणे पाच टक्क्यांपर्यंत येतो. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशी दोन वेगवेगळ्या श्रेणी शासन निर्देशानुसार केल्यास शहराला अधिक फायदा ठरू शकतो. शहरातील जवळपास सर्व निर्बंध संपुष्टात येऊ शकतात. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अडीच टक्क्यांच्या आसपास आहे. राज्य शासनाने शनिवारी रात्री जाहीर केलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे. ग्रामीण भागात आजही संसर्ग बऱ्यापैकी आहे. शहरात दररोज चार हजार नागरिकांच्या तपासण्या केल्या, तर ५० ते ६० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार असून, या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

ग्रामीणमध्ये थोडी सूट, शहरात जास्त

शासनाने टाकलेल्या कडक निर्बंधांमुळे आर्थिक व्यवस्था अत्यंत बिकट झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ग्रामीण भागात काहीशी सूट, तर शहरात बऱ्यापैकी निर्बंध शिथिल होतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

व्यापाऱ्यांचे लागले लक्ष

राज्य शासनाने अनलॉक अंतर्गत पाच टप्पे ठरवून दिले. ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश शासनाने ठरवून दिलेल्या पहिल्या प्रवर्गात होईल का? याकडे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या दुपारी दोन वाजेपर्यंत दुकान उघडण्यासाठी मुभा आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी पुन्हा बाजारपेठ बंद ठेवावी लागत आहे, या निर्बंधातून कायमस्वरूपी सूट मिळावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांची आहे.