शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘नराधमाला तात्काळ अटक करा..!’

By admin | Updated: February 28, 2017 00:59 IST

अंबाजोगाई :गिरवली येथे बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथे ७ फेब्रुवारी रोजी शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तब्बल १२ किमीचे अंतर कापून मोर्चेकरी बैलगाड्यांसह शहरात दाखल झाले होते.गिरीवली येथे शेतकाम करणाऱ्या महिलेवर गावातीलच बाळू शामराव काळे याने अत्याचार केला होता. सुरुवातीला विनयभंग व नंतर बलात्काराची फिर्याद बर्दापूर ठाण्यामध्ये नोंद झाली होती. तीन आठवडयाचा कालावधी उलटूनही आरोपी सापडत नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी गिरवली ते अंबाजोगाई असा १२ कि.मी. अंतराचा ‘नराधम प्रतिबंधक मोर्चा’ काढला. हा मोर्चा गिरवली सबस्टेशन, पिंपळा, शेपवाडी, भगवानबाबा चौक, अण्णा भाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, सावरकर चौक, शिवाजी चौकमार्गे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आरोपीला अटक करा..., महिलांना संरक्षण द्या... अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. गिरवली येथील ग्रामस्थ २५० बैलगाड्यांसह शहरात दाखल झाले. या मोर्चात कालिदास आपेट, प्रताप आपेट, विनोदकुमार बुरांडे, बळवंत बावणे, अ‍ॅड. माधव जाधव, गोविंद पोतंगले, दाजीसाहेब लोमटे, मनोज कदम, संजय आपेट, अ‍ॅड. अमित गिरवलकर, शैलेंद्र आपेट, यशवंत आपेट, केतन निसाले यांच्यासह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन दिले. त्यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच मोर्चेकरी शांत झाले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)