शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

शिवकालीन पाणीपुरवठा योजनांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: February 18, 2016 23:45 IST

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीतून तयार केलेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळमुक्तीची गुरुकिल्ली असतानाही या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीतून तयार केलेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळमुक्तीची गुरुकिल्ली असतानाही या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले असून या योजनेअंतर्गत करावयाच्या कामांसाठीचा ६० लाख रुपयांचा प्रस्ताव तब्बल ११ महिन्यानंतर मंजूर केल्याचा ढिसाळपणा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होतेच, शिवाय पाण्याचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी त्या काळातही किल्ल्यांवर पाण्याचे स्त्रोत निर्माण करुन ठेवले होते. किल्ल्यांवरील तळे, भूमिगत तळे, वर्षभर पाणी टिकणारे तळे असे तळे निर्माण केले होते. या शिवाय पाणीपुरवठ्याचे अन्य स्त्रोतही तयार करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण करणे, पाण्याचे पूनर्भरण आदी प्रयोगही त्या काळात राबविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळावर मात करण्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरु शकते. परंतु, या योजनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेलेच नाही. महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी २००२ मध्ये शिवकालीन पाणीसाठवण योजना राज्यात लागू केली. या योजनेंतर्गत ज्या गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते, अशा गावांची यादी तयार करुन या योजनेंतर्गत पावसाचे व वापरलेल्या पाण्याचे पूनर्भरण, जलस्त्रोताचे बळकटीकरण, कच्च्या बंधाऱ्याची निर्मिती, दगडाखाली पाणी असेल तर जलभंजन करणे, अशा योजनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. योजना चांगली असली तरी ती राबविणारी यंत्रणा सक्षम असली पाहिजे. आघाडी सरकारच्या पहिल्या काळात या योजनेवर चांगले काम झाले. नंतर मात्र योजनेकडे दुर्लक्षच झाले. गतवर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपा-शिवसेना सरकार या योजनेकडे लक्ष देईल, असे वाटत होते. परंतु, राज्यातील युती सरकारने ही योजनाच गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. राज्य शासन एकीकडे जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना शिवकालीन पाणीपुरवठा योजनांकडे पाठ फिरवत असल्याचे गेल्या काही महिन्यांच्या कामकाजावरुन लक्षात येते. परभणी येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने शिवकालीन योजनेअंतर्गत करावयाच्या कामासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी २०१५ रोजी राज्य शासनाकडे पाठविला होता. ६० लाख रुपये खर्चाचा असलेल्या या प्रस्तावाकडे पाहण्यास संबंधित विभागाच्या वरिष्ठांना वेळच मिळाला नाही. तब्बल ११ महिन्यांतर जानेवारी २०१६ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी शिवकालीन पाणीपुरवठा योजनेत एकही काम झाले नाही. आता चालू वर्षी गतवर्षीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याने यावर्षी तरी या अंतर्गत चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.