शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन पाणीपुरवठा योजनांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: February 18, 2016 23:45 IST

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीतून तयार केलेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळमुक्तीची गुरुकिल्ली असतानाही या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीतून तयार केलेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळमुक्तीची गुरुकिल्ली असतानाही या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले असून या योजनेअंतर्गत करावयाच्या कामांसाठीचा ६० लाख रुपयांचा प्रस्ताव तब्बल ११ महिन्यानंतर मंजूर केल्याचा ढिसाळपणा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होतेच, शिवाय पाण्याचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी त्या काळातही किल्ल्यांवर पाण्याचे स्त्रोत निर्माण करुन ठेवले होते. किल्ल्यांवरील तळे, भूमिगत तळे, वर्षभर पाणी टिकणारे तळे असे तळे निर्माण केले होते. या शिवाय पाणीपुरवठ्याचे अन्य स्त्रोतही तयार करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण करणे, पाण्याचे पूनर्भरण आदी प्रयोगही त्या काळात राबविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळावर मात करण्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरु शकते. परंतु, या योजनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेलेच नाही. महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी २००२ मध्ये शिवकालीन पाणीसाठवण योजना राज्यात लागू केली. या योजनेंतर्गत ज्या गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते, अशा गावांची यादी तयार करुन या योजनेंतर्गत पावसाचे व वापरलेल्या पाण्याचे पूनर्भरण, जलस्त्रोताचे बळकटीकरण, कच्च्या बंधाऱ्याची निर्मिती, दगडाखाली पाणी असेल तर जलभंजन करणे, अशा योजनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. योजना चांगली असली तरी ती राबविणारी यंत्रणा सक्षम असली पाहिजे. आघाडी सरकारच्या पहिल्या काळात या योजनेवर चांगले काम झाले. नंतर मात्र योजनेकडे दुर्लक्षच झाले. गतवर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपा-शिवसेना सरकार या योजनेकडे लक्ष देईल, असे वाटत होते. परंतु, राज्यातील युती सरकारने ही योजनाच गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. राज्य शासन एकीकडे जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना शिवकालीन पाणीपुरवठा योजनांकडे पाठ फिरवत असल्याचे गेल्या काही महिन्यांच्या कामकाजावरुन लक्षात येते. परभणी येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने शिवकालीन योजनेअंतर्गत करावयाच्या कामासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी २०१५ रोजी राज्य शासनाकडे पाठविला होता. ६० लाख रुपये खर्चाचा असलेल्या या प्रस्तावाकडे पाहण्यास संबंधित विभागाच्या वरिष्ठांना वेळच मिळाला नाही. तब्बल ११ महिन्यांतर जानेवारी २०१६ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी शिवकालीन पाणीपुरवठा योजनेत एकही काम झाले नाही. आता चालू वर्षी गतवर्षीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याने यावर्षी तरी या अंतर्गत चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.