शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलाव दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 9, 2016 23:55 IST

विष्णू गायकवाड ल्ल गढी कोणत्याही गावास त्या-त्याठिकाणचे पाझर तलाव व धरणातील पाण्याचा मोठा आधार असतो. त्यावरच शेती व्यवसाय तग धरुन असतो.

गंभीर समस्या : गाळ उपसा नसल्याने पाणीसाठा होईनाविष्णू गायकवाड ल्ल गढीकोणत्याही गावास त्या-त्याठिकाणचे पाझर तलाव व धरणातील पाण्याचा मोठा आधार असतो. त्यावरच शेती व्यवसाय तग धरुन असतो. मात्र गेवराई तालुक्यातील गढी परिसरानजीक असलेल्या गोविंदवाडी व शिंदेवाडी पाझर तलावाची दुरवस्था झाली आहे. गाळ काढला नसल्यामुळे पाणीसाठा होत नाही. त्याचा फटका सध्या दुष्काळात शेतकऱ्यांना बसत आहे.अवर्षणाचे हे चौथे वर्ष आहे. थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला दुष्काळामुळे पटू लागले आहे. त्यामुळे गावांगावामध्ये त्यांच्या भागातील साठवणूक करणाऱ्या तलाव, धरणाच्या स्थितीबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळापूर्वीच्या काळात तलावाची दुरुस्ती झाली असती तर आजच्या घडीला पाणीटंचाई फारशी गंभीर झाली नसती, अशी चर्चा गावांमध्ये सुरू आहे. गेवराई रस्त्यालगत असलेल्या गोविंदवाडी तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. या तलावातील गाळ उपसा व खोलीकरण केले तर त्याचा लाभ जवळपासच्या शेतीबरोबरच परिसरातील गावांना याचा लाभ होईल. तसेच जलस्त्रोत वाढण्यासही मोठी मदत होईल. या कामासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. तलाव उशाला आणि कोरड घशाला गोविंदवाडी व शिंदेवाडी तलाव परिसराला लागूनच असल्याने या तलावामध्ये पाण्याचा मोठे स्त्रोत उपलब्ध होवू शकत असतानाही याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याबदल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षापूर्वीचे या तलावाची व्यवस्थित देखभाल केली असती तर तलावामुळे अर्ध्या परिसराला पाणी टंचाई जाणवली नसती. या संदर्भात गेवराईचे तहसीलदार संजय पवार म्हणाले, दोन्हीही पाझर तलावांची पाहणी करून खोलीकरण व डागडुजी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील. गाळ उपसा नाही : शेती नाही ओलिताखालीगोविंदवाडी तलाव हा महामार्गाशेजारी असल्यामुळे तो पिकनिक स्पॉट होऊ शकतो. तलावाच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले तर हा तलाव इतरांसाठी आकर्षण ठरू शकते. शिंदेवाडी व गोविंदवाडी तलावांची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. तसेच गाळ उपसा झाला नसल्यामुळे भरपूर क्षमता असतानाही अपेक्षित पाणीसाठा होत नाही.