शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘रेमडेसिवीर’ हवे तर मग घाटीत पाच दिवस भरती व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयेदेखील आता इंजेक्शन नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ...

औरंगाबाद : राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयेदेखील आता इंजेक्शन नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयाला इंजेक्शनची विचारणा केली जात आहे. परंतु इंजेक्शन बाहेर देण्यात येणार नाही. रुग्णाला पाच दिवसांसाठी घाटीत दाखल करा आणि रेमडेसिवीर घ्या, असा सल्ला घाटी प्रशासनाकडून दिला जात आहे.

पुणे, नांदेडसह राज्यातील अनेक शहरांत रेमडेसिवीर इंजेक्शन सहजपणे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनची शोधाशोध केली जात आहे. या इंजेक्शनसाठी राज्यभरातून नागरिक औरंगाबादेत धाव घेत आहेत. शहरातील काही खासगी रुग्णालयांतही इंजेक्शनचा तुटवडा असल्याची नोंद केंद्रीय पथकाने घेतली आहे. त्यामुळे पथकाने घाटीला इंजेक्शनच्या परिस्थितीविषयी विचारणा केली. तेव्हा इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याची माहिती घाटीने पथकाला दिली. या सगळ्यांत दोन दिवसांपासून घाटीला इंजेक्शनची मागणी केली जात आहे; परंतु इंजेक्शन दिले जाणार नाही. रुग्णाला घाटीत दाखल केल्यास रुग्णाला हे इंजेक्शन दिले जाईल, अशी भूमिका घाटी प्रशासनाने घेतली आहे. घाटीत महिनाभर पुरेल इतका रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

खासगीत कृत्रिम टंचाई?

शहरात इंजेक्शनचा तुटवडा नसल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. शहरातील एखादा रुग्णास इंजेक्शन मिळत नसेल तर औषध निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे; परंतु काही रुग्णालये इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण करीत असल्याची ओरड होत आहे.