शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

‘रेमडेसिवीर’ हवे तर मग घाटीत पाच दिवस भरती व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयेदेखील आता इंजेक्शन नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ...

औरंगाबाद : राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयेदेखील आता इंजेक्शन नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयाला इंजेक्शनची विचारणा केली जात आहे. परंतु इंजेक्शन बाहेर देण्यात येणार नाही. रुग्णाला पाच दिवसांसाठी घाटीत दाखल करा आणि रेमडेसिवीर घ्या, असा सल्ला घाटी प्रशासनाकडून दिला जात आहे.

पुणे, नांदेडसह राज्यातील अनेक शहरांत रेमडेसिवीर इंजेक्शन सहजपणे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनची शोधाशोध केली जात आहे. या इंजेक्शनसाठी राज्यभरातून नागरिक औरंगाबादेत धाव घेत आहेत. शहरातील काही खासगी रुग्णालयांतही इंजेक्शनचा तुटवडा असल्याची नोंद केंद्रीय पथकाने घेतली आहे. त्यामुळे पथकाने घाटीला इंजेक्शनच्या परिस्थितीविषयी विचारणा केली. तेव्हा इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याची माहिती घाटीने पथकाला दिली. या सगळ्यांत दोन दिवसांपासून घाटीला इंजेक्शनची मागणी केली जात आहे; परंतु इंजेक्शन दिले जाणार नाही. रुग्णाला घाटीत दाखल केल्यास रुग्णाला हे इंजेक्शन दिले जाईल, अशी भूमिका घाटी प्रशासनाने घेतली आहे. घाटीत महिनाभर पुरेल इतका रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

खासगीत कृत्रिम टंचाई?

शहरात इंजेक्शनचा तुटवडा नसल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. शहरातील एखादा रुग्णास इंजेक्शन मिळत नसेल तर औषध निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे; परंतु काही रुग्णालये इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण करीत असल्याची ओरड होत आहे.