शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुन्हा सोडतीसाठी राजकीय इच्छाशक्तीचा लागणार कस

By admin | Updated: February 17, 2015 00:41 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेली वॉर्ड आरक्षण सोडत प्रक्रिया नव्याने करण्यात यावी. यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा कस लागणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेली वॉर्ड आरक्षण सोडत प्रक्रिया नव्याने करण्यात यावी. यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा कस लागणार आहे. आयोगाला सर्वोच्च न्यायालय समकक्ष अधिकार असल्यामुळे त्यावर राजकीय दबाव आणणे सोपे नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांचे मतआहे. प्रभाग पद्धती रद्द करून वॉर्ड करणे, सातारा- देवळाई नगर परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असताना तो भाग मनपात आणण्यासाठी अधिसूचना काढणे. नव्याने सोडतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे. ही सर्व प्रक्रिया १८ डिसेंबर ते ११ फेबु्रवारीदरम्यान घडली आहे. राजकीय इच्छाशक्तीमुळेच हे सर्व काही झाल्याने नव्याने सोडत घेण्यासाठी आयोगावर दबाव आणला जाऊ शकतो. आयोग त्या दबावाला किती बळी पडतो, त्यावरच नव्याने वॉर्ड रचना आणि आरक्षण सोडत अवलंबून असल्याचे जाणकारांचे मतआहे. निवडणूक आयोगाच्या कोर्टात पुनर्सोडतीचा चेंडू असून, आजपर्यंत आयोगाने कोणतेही निर्देश मनपा प्रशासनाला दिलेले नाहीत. मनपाने केलेल्या सोडतीवर १६ फेबु्रवारीपर्यंत २५ आक्षेप नोंदविले गेले आहेत. १८ फेबु्रवारी ही आक्षेप नोंदविण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी आयोगाचे अधिकारी येतील. सातारा- देवळाई नगर परिषद मनपात विलीन करून तेथे १५ एप्रिलपूर्वी निवडणूक झाल्यास वॉर्ड आरक्षण नव्याने काढण्यात येईल, असा विश्वास युतीसह ज्यांच्या वॉर्डांवर आरक्षण आले आहे, त्यांना आहे.आयोगाकडून अजून काहीही निर्देश न आल्यामुळे मनपा निवडणूक विभागाने मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे तुकडे करून जुळवणी करण्याचे काम सुरू केले आहे. जुन्या आरक्षणावर निवडणूक आयोगाने राजकीय दबावाखाली गदा आणली तर अनेकांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या वॉर्ड सोडतीमुळे अनेकांना न्याय मिळाल्यासारखे वाटते आहे. नव्याने हद्द मनपात येत आहे. त्यामुळे प्रक्रिया लांबेल असे वाटते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयुक्तांशी याप्रकरणी चर्चा केली आहे. मनपा व सातारा-देवळाई परिसराची नव्याने निवडणूक घेतल्यास खर्च होईल. त्यामुळे पूर्ण शहराची नव्याने वॉर्ड रचना करून आरक्षणासाठी सोडत काढावी. त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी निवडणूक आयोगाला विनंती केल्याचे आ. संजय शिरसाट यांनी सांगितले. शिवसेनेला नव्याने आरक्षण होऊन सोडत व्हावी, अशी अपेक्षा आहे का? यावर आ. संजय शिरसाट म्हणाले, शिवसेना म्हणूनच नाही तर सर्व राजकीय पक्षांची हीच अपेक्षा आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. सेनेतील अनेक खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे सातारा-देवळाई मनपात विलीन करण्याचा आटापिटा केला का? यावर आ. शिरसाट म्हणाले, तसा काहीही प्रयत्न केलेला नाही. निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्याचे आम्ही स्वागत करू.निवडणूक आयोगाच्या काय सूचना येतात, याकडे लक्ष आहे. निवडणूक आयुक्त सहारिया रजेवर गेलेले आहेत. ते रजेवरून आल्यावर काही सूचना मिळतील असे वाटते. सातारा-देवळाई परिसर वैधानिकरीत्या मनपात आल्यावर काम करावेच लागेल.यंत्रणेवर ताण पडला तरी सुविधा देण्यासाठी नियोजन करावेच लागेल. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेजसह वसाहतीसाठी नियोजन करावे लागेल, असे आयुक्त पी. एम. महाजन यांनी सांगितले.