शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पेरणी नसली, तरी मिळणार विमा

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

लातूर : हवामान आधारित पीक विमा योजना लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. पेरणी केली नसली, तरी या योजनेत पिकांना संरक्षण दिले जाणार आहे.

लातूर : हवामान आधारित पीक विमा योजना लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. पेरणी केली नसली, तरी या योजनेत पिकांना संरक्षण दिले जाणार आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, अतिपाऊस या घटकांमुळे कृषी उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे विमा संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.टी.एस. मोटे यांनी दिली.खरीप ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांसाठीच ही योजना लागू करण्यात आली आहे. ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम १५ हजार रुपये असून, त्याचा हप्ता ४.८३ टक्के आहे. तर विमा हप्त्याची रक्कम ७२४.५० एवढी आहे. सोयाबीनसाठी १९ हजार रुपये विमा हप्ता असून, ४.८० टक्के विमा आहे. उडीद-मूग पिकासाठी १५ हजार रुपये तर विमा हप्त्याची रक्कम ४.४३ टक्के आहे. बजाज अलाईन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पीक संरक्षित करण्याची अंतिम मुदत ३० जून असून योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची केली आहे. विमा योजनेसाठी महसूल मंडळ क्षेत्र घटक धरून राबविण्यात येत आहे. योजनेचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँक, प्राथमिक कृषी सहकारी संस्थेत भरता येईल. प्रस्तावासोबत सातबारा, शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असल्याचे कृषी अधिकारी डॉ. मोटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)