शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

...तर शेतकरी आत्महत्येस तुम्हीच जबाबदार असाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST

बीड : बोगस बियाणे कंपन्या भरपूर आहेत. दिवसरात्र कष्ट करूनही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकरी जीवन संपवित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बोगस बियाणे कंपन्या भरपूर आहेत. दिवसरात्र कष्ट करूनही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकरी जीवन संपवित आहेत. अशा बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. या कंपन्यांची बाजू घेताल, तर शेतकरी आत्महत्येस तुम्हीच जबाबदार असाल, असे खडे बोल राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. विविध मुद्यांवरून त्यांची कानउघाडणी केली.राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पीक परिस्थितीची सोमवारी पाहणी केली. सोमवारी त्यांनी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे पीक पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कृषी विभागाबद्दल शेतकऱ्यांकडून भरपूर तक्रारी आहेत. अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापासून प्रत्येकाने शेतकऱ्यांसाठी धावपळ करावी. शासनाला दिलेल्या आठ तासांत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच त्यांच्यापर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत. कंपन्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी कामे करा. ज्या बियाणांच्या विरोधात तक्रारी येतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांना अनुदान असणाऱ्या योजनांचे अनुदान तात्काळ वितरित करा, त्यात चालढकल करू नका. प्रस्तावात काही गोष्टी नसतील तर स्वत: शेतकऱ्यांकडे जावे. गरज पडल्यास तलाठी, इतर अधिकाऱ्यांकडे जाऊन त्या गोष्टींची पूर्तता करा. उन्नत शेती अभियान कायमस्वरूपी राबवा, ठिबकचे अनुदान वाटप करा, पेरणी अहवाल वस्तुस्थितीदर्शक द्या, अशा सूचनाही केंद्रेकर यांनी दिल्या.