शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्रिसूत्री’चे पालन केल्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:02 IST

डॉक्टरांचा सल्ला : काही होत नाही, म्हणू नका, स्वतः नियम पाळा आणि दुसऱ्यांनाही पाळायला सांगा औरंगाबाद : कोरोना ...

डॉक्टरांचा सल्ला : काही होत नाही, म्हणू नका, स्वतः नियम पाळा आणि दुसऱ्यांनाही पाळायला सांगा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस आली आणि लोकांच्या मनातील भीती दूर झाली. खबरदारीशिवाय मुक्त संचार झाला. त्यातूनच कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे; पण ‘त्रिसूत्री’चे पालन केल्यास कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे. ही त्रिसूत्री म्हणजे मास्कचा वापर, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणे. वर्षभरापूर्वी जी खबरदारी घेतली, तीच आताही घ्या आणि कोरोनापासून दूर राहा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणा, प्रशासन अधिक सतर्क झाले आहे; पण नागरिकांनी खबरदारी घेतली तर उपचार घेण्याची आणि क्वारंटाइन होण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी सर्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले पाहिजे. मास्क घालूनच घराबाहेर पडले पाहिजे आणि वारंवार हात स्वच्छ केले पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले.

वर्षभरापूर्वी कोरोनाच्या सुरुवातीला प्रत्येक जण इतरांपासून चार हात दूरच राहत होता. कोणी साधे शिंकले तरी काळजी व्यक्त केली जात असे; पण गेल्या काही दिवसांपासून काही होत नाही म्हणून गळा भेट घेतली जात आहे, गर्दी केली जात आहे. यातूनच कोरोना वाढीला हातभार लागत आहे; पण काही होत नाही म्हणू नका. स्वतः नियम पाळा आणि दुसऱ्यांनाही पाळायला सांगा, असे आवाहन डॉक्टरांनी, आरोग्य यंत्रणेने केले आहे.

चौकट...

ही खबरदारी प्रत्येक जण घेऊ शकतो

सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मस्कचा वापर.

गरज असेल तरच घराबाहेर पडा.

आजार लपवू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सर्दी, खोकला असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.

डॉक्टरांनी कोरोना तपासणीचा सल्ला दिल्यास तपासणी करा.

सार्वजनिक ठिकाणी कोणी मास्क वापरत नसेल तर मास्क वापराचे आवाहन करा.

चौकट..

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव आहेच. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तशी कमी आहे; परंतु परिस्थिती पाहता मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सचे नागरिकांनी पालन केले पाहिजे.

- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

पूर्वीच्या सूचना आजही लागू

पूर्वी ज्या सूचना होत्या, त्या सूचना आजही लागू आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. विनाकारण कुठेही गर्दी करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक