शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बंडखोरांवर कारवाई न झाल्यास बाहेर पडू

By admin | Updated: March 21, 2017 23:55 IST

ब्ाीड : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला. मात्र, काही स्वार्थी नेत्यांमुळे आम्हाला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नाही.

ब्ाीड : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला. मात्र, काही स्वार्थी नेत्यांमुळे आम्हाला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नाही. पक्षाचा व्हीप डावलणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करणार आहोत. ही कारवाई झाली नाही तर आम्ही पक्षाच्या बाहेर पडू, असे मत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवड प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे टी. पी. मुंडे, काकू-नाना आघाडीचे संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, अशोक डक, बजरंग सोनवणे, गंगाधर घुमरे आदींची उपस्थिती होती. पत्रपरिषदेत बोलताना सोळंके म्हणाले की, सुरेश धस यांनी पक्षाचा विश्वासघात केला आहे. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिलेला असताना जिल्हा परिषद सदस्य फोडले. जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे. याचे परिणाम धस यांना भोगावे लागतील. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, सुरेश धस, अक्षय मुंदडा यांनी शरद पवार व अजित पवार यांना धोका दिला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. सुरेश धस यांच्या सांगण्यावरून त्या सहा जि. प. सदस्यांना पक्षाने व्हीप बजावून देखील पक्षाशी त्यांनी गद्दारी केली आहे. त्यांच्यावर ९० दिवसांच्या आत नियमानुसार निलंबनाची कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर देखील या कटात सहभागी असल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री सोळंके यांनी केला, असे सांगून ते पुढे म्हणाले, पक्षाच्या व जनतेच्या विकासाला बाधा ठरत असलेले विश्वासघातकी नेते पक्षातून बाहेर पडत आहेत ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी पोषक आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (प्रतिनिधी)