शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परीक्षेत नेटवर्कचा अडथळा आला, तर समन्वयकाला कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्‌भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी ...

औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्‌भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरकडे संपर्क करून ही बाब कळविल्यास त्याला पुन्हा पेपरची लिंक उपलब्ध करून दिली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेले पदवी अभ्यासक्रमाचे पेपर ३ मेपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून घेण्यात येणार आहे. आता उर्वरित पेपर व परीक्षा फक्त ऑनलाइन घेतल्या जाणार असून, ग्रामीण भागात विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या जाणवल्यास त्याने घाबरून न जाता तात्काळ ही घटना आपल्या संबंधित महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरला कळवावी. त्या कोऑर्डिनेटरने विद्यापीठातील परीक्षा विभागाला त्यासंबंधी माहिती द्यावी. त्यानंतर लगेच संबंधित विद्यार्थ्याला आलेल्या समस्येविषयी खातरजमा केली जाईल. ऑनलाइन परीक्षेसंबंधीच्या पोर्टलवर कोणत्या विद्यार्थ्याला काय समस्या आली, हे ताबडतोब समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्यांना परीक्षा कालावधीत लगेचच लिंक उपलब्ध करून देण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

चौकट......

मेअखेरपर्यंत निकालाचे नियोजन

कला व वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाचे द्वितीय, तृतीय वर्षाचे बहुतांशी पेपर संपले आहेत. विज्ञान शाखेचे ३० टक्के पेपर बाकी आहेत. याशिवाय या तीनही शाखांच्या प्रथम वर्षाचे पेपर १५- १६ मेपर्यंत चालणार आहेत. प्रथम वर्षाची परीक्षा संपल्याशिवाय उर्वरित द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल तांत्रिकदृष्ट्या जाहीर करता येत नाहीत. दुसरीकडे, यापूर्वी ऑफलाइन झालेल्या परीक्षेतील पेपर तपासणीचा संपूर्ण अहवाल महाविद्यालयांकडून परीक्षा विभागाला प्राप्त झालेला नाही. कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयांना तो अहवाल २ मेपर्यंत विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत पदवी परीक्षेचे निकाल जाहीर होतील, अशी शक्यता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी वर्तविली आहे.