शहरं
Join us  
Trending Stories
1
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
4
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
5
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
6
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
7
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
8
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
9
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
10
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
11
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
12
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
13
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
14
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
15
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
16
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
17
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
18
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
19
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
20
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत नेटवर्कचा अडथळा आला, तर समन्वयकाला कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्‌भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी ...

औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्‌भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरकडे संपर्क करून ही बाब कळविल्यास त्याला पुन्हा पेपरची लिंक उपलब्ध करून दिली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेले पदवी अभ्यासक्रमाचे पेपर ३ मेपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून घेण्यात येणार आहे. आता उर्वरित पेपर व परीक्षा फक्त ऑनलाइन घेतल्या जाणार असून, ग्रामीण भागात विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या जाणवल्यास त्याने घाबरून न जाता तात्काळ ही घटना आपल्या संबंधित महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरला कळवावी. त्या कोऑर्डिनेटरने विद्यापीठातील परीक्षा विभागाला त्यासंबंधी माहिती द्यावी. त्यानंतर लगेच संबंधित विद्यार्थ्याला आलेल्या समस्येविषयी खातरजमा केली जाईल. ऑनलाइन परीक्षेसंबंधीच्या पोर्टलवर कोणत्या विद्यार्थ्याला काय समस्या आली, हे ताबडतोब समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्यांना परीक्षा कालावधीत लगेचच लिंक उपलब्ध करून देण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

चौकट......

मेअखेरपर्यंत निकालाचे नियोजन

कला व वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाचे द्वितीय, तृतीय वर्षाचे बहुतांशी पेपर संपले आहेत. विज्ञान शाखेचे ३० टक्के पेपर बाकी आहेत. याशिवाय या तीनही शाखांच्या प्रथम वर्षाचे पेपर १५- १६ मेपर्यंत चालणार आहेत. प्रथम वर्षाची परीक्षा संपल्याशिवाय उर्वरित द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल तांत्रिकदृष्ट्या जाहीर करता येत नाहीत. दुसरीकडे, यापूर्वी ऑफलाइन झालेल्या परीक्षेतील पेपर तपासणीचा संपूर्ण अहवाल महाविद्यालयांकडून परीक्षा विभागाला प्राप्त झालेला नाही. कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयांना तो अहवाल २ मेपर्यंत विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत पदवी परीक्षेचे निकाल जाहीर होतील, अशी शक्यता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी वर्तविली आहे.