शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

दुकान उघडे दिसले, तर भरा १० ते २५ हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:03 IST

औरंगाबाद : संचारबंदीत शेवटच्या आठ दिवसांत अत्यंत कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी सकाळी युद्धपातळीवर महापालिकेने दहा पथके तयार केली. कोरोना ...

औरंगाबाद : संचारबंदीत शेवटच्या आठ दिवसांत अत्यंत कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी सकाळी युद्धपातळीवर महापालिकेने दहा पथके तयार केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. दिवसभरात पथकांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई केली. छोट्या दुकानदारांना १० तर मोठ्या दुकानदारांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला.

राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय विनाकारण फिरण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु या नियमांचे पालन होत नसल्याचे लक्षात आले आहे. संचारबंदीच्या काळातदेखील काही भागातील अनेक दुकाने उघडी राहतात, खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी सकाळी कारवाईसाठी दहा पथके, चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. प्रत्येक झोनसाठी सिलिंगचे साहित्य आणि एक गाडी तयार देण्यात आली. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने, विविध आस्थापना आणि नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. दिवसभरात पथकांनी वेगवेगळ्या भागात कारवाईचा बडगा उगारला. काही ठिकाणी दुकाने सील करण्यात आली.

अहवाल सादर करावा

सर्व पथकप्रमुखांनी घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे रात्री नऊच्या नंतर रोजच्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असेदेखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईची माहिती रात्री उशिरा संकलित होणार असल्याचे भोंबे यांनी सांगितले.