शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

प्राणवायू न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास; सचिव आणि चार नोडल अधिकारी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:04 IST

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात प्राणवायूचा पुरेसा पुरवठा झाला नाही, तसेच प्राणवायू नसल्यामुळे रुग्णालयाने रुग्णास परत पाठविल्यास किंवा प्राणवायू ...

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात प्राणवायूचा पुरेसा पुरवठा झाला नाही, तसेच प्राणवायू नसल्यामुळे रुग्णालयाने रुग्णास परत पाठविल्यास किंवा प्राणवायू न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि चार नोडल अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल. इथून पुढे या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने प्राणवायूचा पुरवठा करावा. प्राणवायूचा आवश्यक पुरवठा केला नाही, तर हे अधिकारी वैयक्तिक कारवाईस पात्र ठरतील, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांनी बुधवारी शासनाला दिला.

कोविडविषयक सुमोटो याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.

अन्न आणि औषधी विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी बुधवारी शपथपत्र दाखल करून विभागात, तसेच संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो आहे आणि रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा नक्की केला जाईल, त्यामुळे रोज २१८ मेट्रिक टन ऑक्सिजनपुरवठ्याच्या आदेशात सुधारणा करावी, अशी विनंती केली. यावर खंडपीठाने तशी दुरुस्ती करण्यास मान्यता देत वरीलप्रमाणे आदेश दिला.

तसेच १ जानेवारी २०२१ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) ला विविध शासकीय संस्था (एनजीओ), केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून किती व्हेंटिलेटर मिळाले. त्यांचे कार्य काय आहे, ते का खराब होतात, याची माहिती सरकारी वकिलांना देण्याचे सूचित केले.

त्याचप्रमाणे किती डीलर्सनी किती दुचाक्या हेल्मटसह विकल्या याचीही माहिती खंडपीठाने मागविली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना कोरोना केंद्रामध्ये नेण्यासाठी बैलगाड्यांचा किंवा अन्य साधनांचा वापर करावा लागत असल्याबद्दल खंडपीठाने मागील सुनावणीवेळी चिंता व्यक्त केली होती. गरिबातील गरीब रुग्णाला कोविड केंद्रात नेण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध होईल, यासाठी दोन हेल्पलाइन नंबर जारी केले जातील, अशी ग्वाही शासनातर्फे आजच्या सुनावणीदरम्यान देण्यात आली.

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार का होतो, अशी विचारणा खंडपीठाने केली. याच विषयावर शुक्रवारी २१ मे रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे, तर शिर्डी संस्थान आणि कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कोविडसंदर्भातील याचिकांवर २५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

आजच्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, औरंगाबाद महापालिकेतर्फे ॲड. संतोष चपळगावकर आदींनी काम पाहिले.

चौकट

नेत्यांनो पक्ष कार्यकर्त्यांना आवर घाला

आज देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत असताना इंधन दरवाढ व अन्य कारणांनी विविध पक्ष कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शने करीत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आवर घालावी, अशी ताकीदवजा सूचना खंडपीठाने केली.