शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास कोविड सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असून, मृत्यू संख्या वाढते आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २५ किंवा ...

औरंगाबाद : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असून, मृत्यू संख्या वाढते आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २५ किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील, तेथे प्रशासनाने ताबडतोब कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नादुरुस्त व्हेंटिलेटर, कोरोनाचा प्रादुर्भाव, नियंत्रण, उपाययोजना, लसीकरण मोहीम, खासगी रुग्णालये आकारत असलेले वाढीव बिले, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपवावी, त्यासाठी त्यांना मदत करावी. लसीकरण सुरळीत होण्यासाठी लसींचा पुरवठा कसा वाढेल. याकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले. खासगी रुग्णालये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत असतील तर ऑडिटरमार्फत त्याची कडक तपासणी करावी. रुग्णांची लूटमार होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीस रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या मागण्या व सूचना अशा

राज्यमंत्री सत्तार म्हणाले, कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लग्न, साखरपुडा, अंत्यविधीकरिता होणाऱ्या गर्दीवर गांभीर्याने लक्ष द्यावे.

खा. जलील यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटरप्रकरणी संबंधित पुरवठा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यासह लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, दंत महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

आ. शिरसाट यांनी घाटीतील रिक्त पदे भरावीत अशी, तर आ. चव्हाण यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटर परत करण्याची सूचना केली. आ. दानवे यांनी मुंबईच्या धर्तीवर जिल्ह्यात लसीकरण करण्याची मागणी केली. आ. बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यात, तर आ. राजपूत यांनी कन्नडमध्ये रुग्णवाहिका देण्याची मागणी केली.