शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

ग्रामीणमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास कोविड सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असून, मृत्यू संख्या वाढते आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २५ किंवा ...

औरंगाबाद : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असून, मृत्यू संख्या वाढते आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २५ किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील, तेथे प्रशासनाने ताबडतोब कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नादुरुस्त व्हेंटिलेटर, कोरोनाचा प्रादुर्भाव, नियंत्रण, उपाययोजना, लसीकरण मोहीम, खासगी रुग्णालये आकारत असलेले वाढीव बिले, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपवावी, त्यासाठी त्यांना मदत करावी. लसीकरण सुरळीत होण्यासाठी लसींचा पुरवठा कसा वाढेल. याकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले. खासगी रुग्णालये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत असतील तर ऑडिटरमार्फत त्याची कडक तपासणी करावी. रुग्णांची लूटमार होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीस रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या मागण्या व सूचना अशा

राज्यमंत्री सत्तार म्हणाले, कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लग्न, साखरपुडा, अंत्यविधीकरिता होणाऱ्या गर्दीवर गांभीर्याने लक्ष द्यावे.

खा. जलील यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटरप्रकरणी संबंधित पुरवठा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यासह लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, दंत महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

आ. शिरसाट यांनी घाटीतील रिक्त पदे भरावीत अशी, तर आ. चव्हाण यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटर परत करण्याची सूचना केली. आ. दानवे यांनी मुंबईच्या धर्तीवर जिल्ह्यात लसीकरण करण्याची मागणी केली. आ. बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यात, तर आ. राजपूत यांनी कन्नडमध्ये रुग्णवाहिका देण्याची मागणी केली.