शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मीटर न बसविल्यास नळ कनेक्शन तोडणार

By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST

लातूर : नागरिकांनी स्वत:हून नळाला मीटर बसविण्यासाठी आता २० जानेवारी २०१७ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

लातूर : नागरिकांनी स्वत:हून नळाला मीटर बसविण्यासाठी आता २० जानेवारी २०१७ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत मनपाच्या नोंदणीकृत प्लंबरकडून मीटर बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर मनपा आपल्या मंजूर दरानुसार मीटर बसविणार आहे. त्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाईल. शिवाय, जे ग्राहक मीटर बसविणार नाहीत, त्यांचा पाणीपुरवठा बंद किंवा नळ कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. महिनाभरापूर्वी मनपाने शहरातील नागरिकांना स्वत:हून नळाला मीटर बसविण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाला सध्या तरी प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील ४७ हजार ग्राहकांपैकी केवळ साडेतीनशे ग्राहकांकडे नळाला मीटर आणि तोट्या आहेत. उर्वरित ग्राहकांकडे तोट्याही नाहीत अन् मीटरही नाही. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासनाने नळाला जलमापके बसविण्यासाठी परत आवाहन केले आहे. नोंदणीकृत प्लंबरकडून मीटर बसविण्याचे आवाहन केले आहे. २० जानेवारीनंतर ज्या ग्राहकांच्या नळाला मीटर बसविल्याचे दिसणार नाही, त्यांच्या नळांना महापालिकेच्या मंजूर निविदा दरानुसार मीटर बसविण्यात येणार आहे. त्याचा पूर्ण खर्च महापालिकेकडे भरणे संबंधित ग्राहकांना बंधनकारक राहील. अन्यथा ग्राहकांच्या नळपट्टी बिलातून सदर खर्च व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. जर खर्च दिला नाही, तर संबंधित ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. शिवाय, नळ कनेक्शनही तोडण्यात येणार आहे. जलमापके बसविताना मीटरच्या मागील बाजूस व्हॉल्व बसविण्यात यावे तसेच मीटरच्या सुरक्षिततेसाठी फायबर / एचडीपीई प्रोटेक्शन बॉक्स (कुलूप लावण्याच्या सोयीसह) बसविण्यात यावे. नळाला पाणी येण्याची पूर्वसूचना देणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापरही ग्राहकांनी आपल्या स्तरावर करावा, असे आवाहनही महापालिका उपायुक्तांनी केले आहे. मीटर बसविण्याबाबतचा सर्व तपशील महापालिकेने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.एमसीलातूर. ओआरजी या वेबसाईटवर प्रसिद्ध असून, तो नागरिकांना पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)