शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

मास्क नसलेल्या ग्राहकाला सामान दिल्यास दुकान १५ दिवस सील

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी ...

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र नियमांचे १०० टक्के पालन करावेच लागेल. विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसांसाठी सील करण्यात येईल. शहरातील मंगल कार्यालयांमध्ये लग्नकार्यासाठी अफाट गर्दी होते आहे. सर्व मंगल कार्यालय चालकांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.

पांडेय यांनी सांगितले की, बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. यापुढे व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ग्राहकांना मास्क नसताना दुकानात प्रवेश द्यायला नको. अनेक ठिकाणी असे होताना दिसून येत नाही. यापुढे दुकानात मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित दुकान मालक अडचणीत येणार आहे. १५ दिवसांसाठी संबंधित दुकान सील करण्यात येईल. शासनाने मंगल कार्यालयात फक्त ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. सध्या कुठे पाचशे तर कुठे हजार नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सुरू आहेत. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.

लॉकडाऊन करण्याचा विचार नाही

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या चारशे किंवा पाचशे पर्यंत गेली तर याचाही विचार होईल. रुग्णसंख्या दोनशेपर्यंत गेल्यास परिस्थिती खूप हाताबाहेर गेलेली नाही असे म्हणता येईल. नागरिकांनी फक्त आणि फक्त मास्कचा वापर केला पाहिजे असेही पांडेय यांनी नमूद केले.