शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मास्क नसलेल्या ग्राहकाला सामान दिल्यास दुकान १५ दिवस सील

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी ...

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र नियमांचे १०० टक्के पालन करावेच लागेल. विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसांसाठी सील करण्यात येईल. शहरातील मंगल कार्यालयांमध्ये लग्नकार्यासाठी अफाट गर्दी होते आहे. सर्व मंगल कार्यालय चालकांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.

पांडेय यांनी सांगितले की, बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. यापुढे व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ग्राहकांना मास्क नसताना दुकानात प्रवेश द्यायला नको. अनेक ठिकाणी असे होताना दिसून येत नाही. यापुढे दुकानात मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित दुकान मालक अडचणीत येणार आहे. १५ दिवसांसाठी संबंधित दुकान सील करण्यात येईल. शासनाने मंगल कार्यालयात फक्त ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. सध्या कुठे पाचशे तर कुठे हजार नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सुरू आहेत. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.

लॉकडाऊन करण्याचा विचार नाही

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या चारशे किंवा पाचशे पर्यंत गेली तर याचाही विचार होईल. रुग्णसंख्या दोनशेपर्यंत गेल्यास परिस्थिती खूप हाताबाहेर गेलेली नाही असे म्हणता येईल. नागरिकांनी फक्त आणि फक्त मास्कचा वापर केला पाहिजे असेही पांडेय यांनी नमूद केले.