शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

मास्क नसलेल्या ग्राहकाला सामान दिल्यास दुकान १५ दिवस सील

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी ...

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र नियमांचे १०० टक्के पालन करावेच लागेल. विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसांसाठी सील करण्यात येईल. शहरातील मंगल कार्यालयांमध्ये लग्नकार्यासाठी अफाट गर्दी होते आहे. सर्व मंगल कार्यालय चालकांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.

पांडेय यांनी सांगितले की, बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. यापुढे व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ग्राहकांना मास्क नसताना दुकानात प्रवेश द्यायला नको. अनेक ठिकाणी असे होताना दिसून येत नाही. यापुढे दुकानात मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित दुकान मालक अडचणीत येणार आहे. १५ दिवसांसाठी संबंधित दुकान सील करण्यात येईल. शासनाने मंगल कार्यालयात फक्त ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. सध्या कुठे पाचशे तर कुठे हजार नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सुरू आहेत. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.

लॉकडाऊन करण्याचा विचार नाही

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या चारशे किंवा पाचशे पर्यंत गेली तर याचाही विचार होईल. रुग्णसंख्या दोनशेपर्यंत गेल्यास परिस्थिती खूप हाताबाहेर गेलेली नाही असे म्हणता येईल. नागरिकांनी फक्त आणि फक्त मास्कचा वापर केला पाहिजे असेही पांडेय यांनी नमूद केले.