शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

माध्यमिक, महाविद्यालयाचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्राथमिकचे वर्ग सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:03 IST

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट आलीच नाही. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. माध्यमिक ...

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट आलीच नाही. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. माध्यमिक विभागाचे वर्ग यशस्वीरीत्या सुरू झाल्यास प्राथमिक विभागाचे सर्व वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. वर्षअखेरीस काही दिवस तरी शाळा सुरू करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेतली. विशेष बाब म्हणजे ५० टक्के पालकांनी वर्ग सुरू करण्यास संमती दर्शविली आहे. सोमवारी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयांमध्ये किमान पन्नास टक्के विद्यार्थी हजर राहतील, असा अंदाज शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवस माध्यमिक विभागाचे वर्ग सुरळीतपणे सुरू राहिल्यास इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा मानस महापालिका प्रशासनाने व्यक्त केला. शहरातील कोचिंग क्लासेसही अद्यापपर्यंत बंद आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी नमूद केले. शहरातील अनेक शाळांनी ऑनलाइन क्लासेसचा अवलंब केला होता. मात्र, तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. खाजगी शाळांनी ऑनलाइन क्लासेसच्या नावावर पालकांकडून शंभर टक्के फी वसूल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.