शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव

By मुजीब देवणीकर | Updated: December 27, 2023 13:25 IST

महाविकास आघाडीत एमआयएमला सामावून घ्या; इम्तियाज जलील यांचा पुन्हा एकदा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीत शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह अन्य घटक पक्ष आहेत. आम्हालासुद्धा त्यांनी सोबत घेतले पाहिजे. प्रसारमाध्यमांमार्फत आम्ही महाविकास आघाडीला हा प्रस्ताव देतोय. त्यांनी चर्चेसाठी बोलवावे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी बोलणी होऊ शकते. शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाऊ शकते, तर आम्ही का नको, असा प्रश्न खा. इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी फक्त महाराष्ट्रापर्यंतच बोलू शकतो. इंडिया आघाडीत जायचे किंवा नाही, हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी घेतील. महाराष्ट्रात एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहे. भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर आम्हाला सोबत घ्यावे लागेल. आमची राज्यात किती ताकद आहे, हे यापूर्वीच्या निवडणुकांवरून निदर्शनास आले आहे. दीडशे वर्षे जुन्या काँग्रेसने अहंकार बाळगू नये. सध्या राज्यात ते लोकसभेत शून्यावर आहेत. राज्यात आमचा एक तरी खासदार आहे. कोणाला कमी लेखण्यात काही अर्थ नाही. वारंवार आमच्यावर आरोप केले जातात. आम्ही जिथे निवडणुका लढवितो, तेथे भाजपला फायदा होतो. आम्हाला सोबत घ्यायला काय हरकत आहे? सध्या चेंडू महाविकास आघाडीच्या कोर्टात असून, त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने निवडणुका लढण्यास तयार आहोत. एमआयएमला अस्पृश्य समजू नये, असा टोलाही जलील यांनी लगावला.

महाविकास आघाडीकडून काही निरोप आला तर टेबलवर बसून जागा वाटपाबाबत चर्चा होईल. तूर्त आम्ही काहीही म्हणणार नाही. एमआयएम सध्या राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष आहे, हे विसरू नये. यांचा पुनरुच्चार त्यांनी केला. खा. जलील यांनी यापूर्वीही एकदा काँग्रेस, राष्ट्रवादीकडे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता, हे विशेष.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन