शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

भाजपला मताधिक्य तर सेना, राष्ट्रवादीचा अंदाज चुकला

By admin | Updated: October 22, 2014 01:17 IST

फकिरा देशमुख ,भोकरदन भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुथ व गाव निहाय आकडेवारीत भाजपाने भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सुद्धा पहिल्या क्रमाकांची मते

फकिरा देशमुख ,भोकरदनभोकरदन विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुथ व गाव निहाय आकडेवारीत भाजपाने भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सुद्धा पहिल्या क्रमाकांची मते घेऊन विजय संपादन केल्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचे विजयाचे गणित हुकले आहे.विशेष म्हणजे केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे डावपेच यशस्वी ठरल्याचे दिसून येते.भोकरदन विधानसभा मतदार संघात यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवित आपली ताकद आजमविण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला पंचरंगी वाटत असलेली निवडणूक मतदारांनी चक्क तिरंगी केली. कारण मते देऊन वाया घालविण्यापेक्षा स्पर्धेतील उमेदवाराला मत देण्याचा निर्णय मतदारांनी घेतल्याचे दिसते. या मतदार संघात भाजपाचे संतोष दानवे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे, मनसेचे दिलीप वाघ हे तीन पक्षांचे उमेदवार भोकरदन तालुक्यातील तर शिवसेनेचे रमेश गव्हाड, काँग्रेसचे सुरेश गवळी, बसपाचे गौतम म्हस्के हे तीन पक्षांचे उमेदवार हे जाफराबाद तालुक्यातील होते. या निवडणुकीत पहिल्यांदाच जाफराबाद तालुक्याला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याचा आनंद झाला होता. या मुद्यावर तालुका एक करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मात्र याला रमेश गव्हाड व सुरेश गवळी यांना यश आले नाही. कारण जाफराबाद तालुक्यातून सुध्दा भाजपाचे संतोष दानवे यांना या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्तीची मते मिळाली. निवडणुकीच्या काळात तालुुक्यातील उमेदवार म्हणून रमेश गव्हाड यांना जाफराबाद तालुक्यात २३ हजार ३३५ मते मिळाली. संतोष दानवे यांना २८ हजार ९० मते मिळाली तर चंद्रकांत दानवे यांना या तालुक्यात २० हजार २७५ ही तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भोकरदन तालुक्यात मात्र संतोष दानवे यांनी तब्बल ४४ हजार ९३५ मते घेऊन पहिला क्रमांक मिळविला. त्या पाठोपाठ चंद्रकांत दानवे यांना ३९ हजार ३५५ मते मिळाली. रमेश गव्हाड यांना या तालुक्यात केवळ १२ हजार ६०४ मते घेता आली. त्यामुळे रमेश गव्हाड हे स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.या उमदेवारांमध्ये पोस्टल मतांमध्ये सुध्दा संतोष दानवे यांना १५३ तर चंद्रकांत दानवे यांना ८७ तर रमेश गव्हाड यांना ७० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या गड असलेल्या मुस्ल्मि बहुसंख्य असलेल्या कठोरा बाजार या गावात भाजपाने आतापर्यंत पहिल्यांदाच मताधिक्य मिळविले आहे. भोकरदन व जाफराबादमध्ये राष्ट्रवादीला आघाडी असली तरी ती आतापर्यंतच्या निवडणुकीच्या तुलनेत अत्यल्प होती. कारण या ठिकाणी शफीकखॉ पठाण यांच्या रिक्षाने ही मते घेतली होती. रिक्षाला ४ हजार ७६२ मते मिळाली तर जाफराबाद तालुक्यात बसपाच्या गौतम म्हस्के यांच्या हत्तीने ४ हजार ६१७ मते घेऊन घड्याळावर पाय देण्याचे काम केले आहे. तर काँग्रेसला पहिल्यांदाच नामुष्की होईल एवढे मतदान झाल्याने काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी कटल्यामुळे लक्ष्मणराव दळवी यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्याना केवळ २ हजार ५८७ मते मिळाली. त्यामुळे त्यांना मतदारांनी साथ दिली नाही. तर मनसेचे उमेदवार भोकरदन तालुक्यातील असले तरी ते व्यवसायाने सुपा जि़ नगर येथे वास्तव्यास असल्याने या वेळी त्यांना मतदारांनी झिडकारले.शिवाय त्याचे सुध्दा अनेक मोहरे हे भाजपाच्या गळाला लागल्याने रेल्वेइंजिन बंद पडले होते.मनसेला ३ हजार १६३ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या वेळी तिसऱ्या फेरीत चंद्रकांत दानवे यांना २११ मते शिल्लकीची तर पंधराव्या फेरीत ६४ मते शिल्लकची पडली होती. उर्वरित २० फेऱ्यांमध्ये संतोष दानवे यांनी प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेऊन विजयात रुपांतर केले़ या निवडणुकीत संतोष दानवे हे निवडून आले असले तरी यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांनी दिलेली साथ तसेच काही विरोधी पक्षांतील मोहऱ्यांना आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आल्यामुळे या मतदारसंघात भाजपाची सत्ता येण्यास मदत झाली आहे़ परिणामी स्वत:च्या चिरंजीवाला निवडणुकीत यश मिळवून देता आले.