शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या न्यायालयात मला न्यायच मिळाला

By admin | Updated: July 14, 2016 01:05 IST

गोविंद इंगळे , निलंगा संघर्षातून घडलेला मी कार्यकर्ता असून गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघातील जनतेने माझे पालकत्वाची भूमिका निभावली म्हणून

गोविंद इंगळे , निलंगासंघर्षातून घडलेला मी कार्यकर्ता असून गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघातील जनतेने माझे पालकत्वाची भूमिका निभावली म्हणून हा माझा सत्कार नसून जनतेचा मला आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम आहे, अशा शब्दात राज्याचे कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्काराला उत्तर दिले.नीळकंठेश्वर मार्केट येथे सर्वपक्षीय सत्कार समारंभात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई बळीराम पाटील होते. मंचावर खा.डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, प्रेरणाताई पाटील निलंगेकर, आ. सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरूके, मधुताई बिरादार, सं.गा.यो.चे अध्यक्ष अजित पाटील, अशोक बाहेती, अजित माने, शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, दगडू सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी निलंगेकर म्हणाले, रक्ताच्या नात्यापासून मी १५ वर्षांपासून बाहेर पडलो. माझ्या मतदार संघातील जनतेने मायेचे छत्र देऊन नातेसंबंधांना आकार दिला. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी कॅबिनेट मंत्री झालो, असे सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझ्याकडे कामगार खाते आहे. या माध्यमातून कामगारांचा उत्कर्ष कसा होईल, कौशल्य विकासच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून मतदार संघात मोठमोठ्या उद्योगांचे जाळे पसरवू, तसेच ग्रामीण भागात रखडलेली विकासकामे प्राधान्याने कामे केली जातील, असेही ते म्हणाले.खा. सुनील गायकवाड यांचेही यावेळी भाषण झाले. प्रारंभी संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विविध पक्ष व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात शिवसेनेचे शेषराव ममाले, राष्ट्रवादीचे सुधीर मसळगे, रिपाइं आठवले गटाचे अंकुश ढेरे, रिपाइं डेमोक्रेटिकचे विकास सूर्यवंशी, सरपंच संघटनेचे अजित माने, भटक्या विमुक्त संघटनेचे विकास माने, डॉक्टर असो.चे डॉ. काकासाहेब देशमुख, मनसेचे डॉ. नरसिंग भिकाणे, पत्रकार संघटनेचे राम काळगे, शेतकरी सहकारी साखर कारखाना, उदगीर भाजपा, संभाजी बिग्रेड, शिक्षक संघटना, भालचंद्र ब्लड बँक, माजी सैनिक संघटना, धनगर समाज, शिरुर अनंतपाळ व देवणी परिसरातील विविध संघटना यांचा समावेश होता. सूत्रसंचालन संजय दोरवे यांनी केले तर आभार अजित माने यांनी मानले. खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. मात्र जनताजनार्दनाला साक्ष ठेवून सांगतो, मी निर्दोष आहे. मी कोणाही शेतकऱ्याला किंबहुना बँकांना बुडविले नाही. माझा वाद पारिवारिक आहे. जर यात मी दोषी आढळलो तर मंत्रिपदाचाच नाही तर राजकीय संन्यास घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही. न्यायालयाचा निर्णय मान्य राहीलच; पण विधानसभेच्या निवडणुकीत मला विजयी करून जनताजनार्दनाच्या न्यायालयात न्यायच मिळाला आहे. रुपाताई पाटील म्हणाल्या, रामाचा वनवास हा १४ वर्षांचा होता, पण त्यापेक्षा जास्त काळ आमचा वनवास होता. आज तो वनवास संपला आहे. पंढरीची वारी सुरू आहे. मात्र आम्ही जनतेमध्येच विठ्ठल-पांडुरंग पाहतो. माझ्या जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी संभाजीराव व माझी सून प्रेरणावर टाकते, असेही त्या म्हणाल्या.