शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

जनतेच्या न्यायालयात मला न्यायच मिळाला

By admin | Updated: July 14, 2016 01:05 IST

गोविंद इंगळे , निलंगा संघर्षातून घडलेला मी कार्यकर्ता असून गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघातील जनतेने माझे पालकत्वाची भूमिका निभावली म्हणून

गोविंद इंगळे , निलंगासंघर्षातून घडलेला मी कार्यकर्ता असून गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघातील जनतेने माझे पालकत्वाची भूमिका निभावली म्हणून हा माझा सत्कार नसून जनतेचा मला आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम आहे, अशा शब्दात राज्याचे कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्काराला उत्तर दिले.नीळकंठेश्वर मार्केट येथे सर्वपक्षीय सत्कार समारंभात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई बळीराम पाटील होते. मंचावर खा.डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, प्रेरणाताई पाटील निलंगेकर, आ. सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरूके, मधुताई बिरादार, सं.गा.यो.चे अध्यक्ष अजित पाटील, अशोक बाहेती, अजित माने, शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, दगडू सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी निलंगेकर म्हणाले, रक्ताच्या नात्यापासून मी १५ वर्षांपासून बाहेर पडलो. माझ्या मतदार संघातील जनतेने मायेचे छत्र देऊन नातेसंबंधांना आकार दिला. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी कॅबिनेट मंत्री झालो, असे सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझ्याकडे कामगार खाते आहे. या माध्यमातून कामगारांचा उत्कर्ष कसा होईल, कौशल्य विकासच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून मतदार संघात मोठमोठ्या उद्योगांचे जाळे पसरवू, तसेच ग्रामीण भागात रखडलेली विकासकामे प्राधान्याने कामे केली जातील, असेही ते म्हणाले.खा. सुनील गायकवाड यांचेही यावेळी भाषण झाले. प्रारंभी संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विविध पक्ष व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात शिवसेनेचे शेषराव ममाले, राष्ट्रवादीचे सुधीर मसळगे, रिपाइं आठवले गटाचे अंकुश ढेरे, रिपाइं डेमोक्रेटिकचे विकास सूर्यवंशी, सरपंच संघटनेचे अजित माने, भटक्या विमुक्त संघटनेचे विकास माने, डॉक्टर असो.चे डॉ. काकासाहेब देशमुख, मनसेचे डॉ. नरसिंग भिकाणे, पत्रकार संघटनेचे राम काळगे, शेतकरी सहकारी साखर कारखाना, उदगीर भाजपा, संभाजी बिग्रेड, शिक्षक संघटना, भालचंद्र ब्लड बँक, माजी सैनिक संघटना, धनगर समाज, शिरुर अनंतपाळ व देवणी परिसरातील विविध संघटना यांचा समावेश होता. सूत्रसंचालन संजय दोरवे यांनी केले तर आभार अजित माने यांनी मानले. खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. मात्र जनताजनार्दनाला साक्ष ठेवून सांगतो, मी निर्दोष आहे. मी कोणाही शेतकऱ्याला किंबहुना बँकांना बुडविले नाही. माझा वाद पारिवारिक आहे. जर यात मी दोषी आढळलो तर मंत्रिपदाचाच नाही तर राजकीय संन्यास घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही. न्यायालयाचा निर्णय मान्य राहीलच; पण विधानसभेच्या निवडणुकीत मला विजयी करून जनताजनार्दनाच्या न्यायालयात न्यायच मिळाला आहे. रुपाताई पाटील म्हणाल्या, रामाचा वनवास हा १४ वर्षांचा होता, पण त्यापेक्षा जास्त काळ आमचा वनवास होता. आज तो वनवास संपला आहे. पंढरीची वारी सुरू आहे. मात्र आम्ही जनतेमध्येच विठ्ठल-पांडुरंग पाहतो. माझ्या जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी संभाजीराव व माझी सून प्रेरणावर टाकते, असेही त्या म्हणाल्या.